शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधवांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:20 IST

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

अडरे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतचे आमदार 'नॉट रिचेबल असतानाच आमदार भास्कर जाधव मात्र मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाचे काम करत त्यांनी पक्षासोबतच असल्याचे दाखवून दिले आहे.भास्कर जाधव यांनी मंगळवारी आपल्या गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकदिलाने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.चिपळूण शहरातील काविळतळी बांदल हायस्कूलच्या सभागृहात चिपळूण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, तालुका संपर्क संघटक अशोक नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळ जाधव, युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते, तालुका महिला संघटक सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा खांडेकर, पूनम चव्हाण, प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, माजी उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते. सुभाष कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.शिवसेनेचा भगवा फडकवूयाभास्कर जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अहोरात्र काम करून महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. केंद्र सरकारने मदत दिली नाहीच उलट टीकाटिप्पणी केली, अडचणी आणल्या. भाजपने सरकार पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले हे दुर्दैव आहे. आता आपण सर्वांनी एकजीव होऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवूया, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.शिवसैनिक हे मानाचे पदजिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले की, ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नाही, ज्यांच्या काही अडचणी असतील तर सांगा व काम होणार नसेल तर स्वतःहून बाजूला व्हा. मात्र, सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा. पदे येतात व जातात. पण शिवसैनिक हे मानाचे पद कायम राहते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मालदोली, उमरोली, वहाळ, निवळी व कोकरे गटातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सरकार स्थिर राहील : भास्कर जाधवबैठक संपल्यानंतर आमदार भास्कर जाधव मुंबईला गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेना