शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधवांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:20 IST

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

अडरे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतचे आमदार 'नॉट रिचेबल असतानाच आमदार भास्कर जाधव मात्र मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाचे काम करत त्यांनी पक्षासोबतच असल्याचे दाखवून दिले आहे.भास्कर जाधव यांनी मंगळवारी आपल्या गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकदिलाने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.चिपळूण शहरातील काविळतळी बांदल हायस्कूलच्या सभागृहात चिपळूण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, तालुका संपर्क संघटक अशोक नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळ जाधव, युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते, तालुका महिला संघटक सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा खांडेकर, पूनम चव्हाण, प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, माजी उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते. सुभाष कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.शिवसेनेचा भगवा फडकवूयाभास्कर जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अहोरात्र काम करून महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. केंद्र सरकारने मदत दिली नाहीच उलट टीकाटिप्पणी केली, अडचणी आणल्या. भाजपने सरकार पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले हे दुर्दैव आहे. आता आपण सर्वांनी एकजीव होऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवूया, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.शिवसैनिक हे मानाचे पदजिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले की, ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नाही, ज्यांच्या काही अडचणी असतील तर सांगा व काम होणार नसेल तर स्वतःहून बाजूला व्हा. मात्र, सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा. पदे येतात व जातात. पण शिवसैनिक हे मानाचे पद कायम राहते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मालदोली, उमरोली, वहाळ, निवळी व कोकरे गटातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सरकार स्थिर राहील : भास्कर जाधवबैठक संपल्यानंतर आमदार भास्कर जाधव मुंबईला गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेना