शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधवांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:20 IST

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

अडरे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेतचे आमदार 'नॉट रिचेबल असतानाच आमदार भास्कर जाधव मात्र मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाचे काम करत त्यांनी पक्षासोबतच असल्याचे दाखवून दिले आहे.भास्कर जाधव यांनी मंगळवारी आपल्या गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकदिलाने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.चिपळूण शहरातील काविळतळी बांदल हायस्कूलच्या सभागृहात चिपळूण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, तालुका संपर्क संघटक अशोक नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळ जाधव, युवा सेनेचे तालुकाधिकारी उमेश खताते, तालुका महिला संघटक सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा खांडेकर, पूनम चव्हाण, प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, माजी उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते. सुभाष कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.शिवसेनेचा भगवा फडकवूयाभास्कर जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अहोरात्र काम करून महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. केंद्र सरकारने मदत दिली नाहीच उलट टीकाटिप्पणी केली, अडचणी आणल्या. भाजपने सरकार पाडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले हे दुर्दैव आहे. आता आपण सर्वांनी एकजीव होऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवूया, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.शिवसैनिक हे मानाचे पदजिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले की, ज्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नाही, ज्यांच्या काही अडचणी असतील तर सांगा व काम होणार नसेल तर स्वतःहून बाजूला व्हा. मात्र, सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा. पदे येतात व जातात. पण शिवसैनिक हे मानाचे पद कायम राहते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मालदोली, उमरोली, वहाळ, निवळी व कोकरे गटातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सरकार स्थिर राहील : भास्कर जाधवबैठक संपल्यानंतर आमदार भास्कर जाधव मुंबईला गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत बोलणे त्यांनी टाळले पण हे सरकार स्थिर राहील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेना