शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

By संदीप बांद्रे | Updated: June 9, 2024 17:40 IST

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

चिपळूण : लोकसभा निवडणूकीत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करून अपेक्षित यश मिळवून दिल्यानंतर "मातोश्री"चा आमदार भास्करराव जाधव यांच्यावरील विश्वास अधिक वाढला असून त्यांना पक्षाने आता पुन्हा त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही काळानंतर त्यांना पक्षाचे उप नेते पद देण्यात आले. या पदावर देखील त्यांनी उत्तम काम केले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा आमदार जाधवावरील विश्वास वाढला. विधानसभा सभागृहातील कामकाजात लक्ष घालत  जाधव यांनी सभागृह अक्षरशः गाजवले. विधानसभेच्या अध्यक्ष पदावर तर त्यांनी ऐतिहासिक असे काम करून दाखवले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार जाधव पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. होऊदे चर्चा, जन संवाद अशा पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना थेट शिवसेना नेते पदाची जबादारी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली होती.

पूर्व विदर्भात देखील त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत असे यश मिळवून दिले. त्यामुळे आमदार जाधव यांच्यावर दिलेली जबाबदारी ते ताकदीने व प्रामाणिकपणे पूर्ण करतात असा  पक्षप्रमुखांचा अधिक विश्वास संपादन करण्यात जाधव यशस्वी झाल्याचे आता स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडे पूर्व विदर्भासह सातारा,सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचे विभागीय नेते पद देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून तसे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChiplunचिपळुण