शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई-video

By मनोज मुळ्ये | Updated: April 24, 2023 19:39 IST

सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून केले जाणार आहे. त्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यासारखी कृत्ये करणाऱ्या तब्बल ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवले जात असून, या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.बारसू भागातील सद्यस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस खात्याकडून सुरू असलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधीक्षकांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही उपस्थित होत्या.राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस खाते बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस खात्याने कोणावरही दडपशाही केलेली नाही. पोलिस केवळ कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याचेच पालन करत आहेत, असे ते म्हणाले.लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे, समाजमाध्यमांचा दुरुपयोग करणे यासारख्या कारणांमुळे ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना जिल्हाबंदीचे, काही जणांना तालुका बंदीचे तर काही जणांना गावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, त्यांना मंगळवार २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी दोघांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.गेल्या काही दिवसात जिल्हाधिकारी तसेच मी या भागातील लोकांच्या बैठका घेतल्या आहेत. आंदोलन करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन लोकांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन आम्ही दोघांनीही लोकांना वारंवार केले आहे. मात्र काहीजणांना चर्चा करण्यापेक्षा फक्त विरोधच करायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पPoliceपोलिस