शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई-video

By मनोज मुळ्ये | Updated: April 24, 2023 19:39 IST

सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून केले जाणार आहे. त्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यासारखी कृत्ये करणाऱ्या तब्बल ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी, गावबंदी अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सोशल मीडियाचा आधार घेत लोकांच्या भावना भडकवणाऱ्या लोकांवरही लक्ष ठेवले जात असून, या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.बारसू भागातील सद्यस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस खात्याकडून सुरू असलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधीक्षकांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही उपस्थित होत्या.राजापूर तालुक्यात बारसू भागात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे एक सर्वेक्षण एमआयडीसीकडून होणार आहे. हे सर्वेक्षण कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत चालेल, याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र या सर्वेक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस खाते बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस खात्याने कोणावरही दडपशाही केलेली नाही. पोलिस केवळ कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याचेच पालन करत आहेत, असे ते म्हणाले.लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे, समाजमाध्यमांचा दुरुपयोग करणे यासारख्या कारणांमुळे ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना जिल्हाबंदीचे, काही जणांना तालुका बंदीचे तर काही जणांना गावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, त्यांना मंगळवार २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी दोघांवर अशाच पद्धतीने कारवाई करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.गेल्या काही दिवसात जिल्हाधिकारी तसेच मी या भागातील लोकांच्या बैठका घेतल्या आहेत. आंदोलन करण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन लोकांनी आपल्या शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन आम्ही दोघांनीही लोकांना वारंवार केले आहे. मात्र काहीजणांना चर्चा करण्यापेक्षा फक्त विरोधच करायचा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पPoliceपोलिस