शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:24 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

रत्नागिरी : इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार करुन प्रकल्पाला विरोध केला आहे. केंद्राने पुन्हा निर्णय घेतला असेल तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलतील, त्यांच्या भावना समजून घेतील त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले.केंद्र सरकारने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आपली भूमिका मांडली.  मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर बरीच वर्ष प्रकल्पाचे काम बंद होते. कालच केंद्र सरकारने पुन्हा प्रकल्पाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक आमदार असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, लोकसभेचे सदस्य विनायक राऊत हे पुन्हा एकदा तेथील लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशापद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही.शिवसेनेने पूर्वी निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय होता. जनतेचा विरोध होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलत नाहीत, त्यांच्या भावना समजून घेत नाहीत, तोपर्यंत बोलणे उचित नाही, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पUday Samantउदय सामंत