शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:24 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

रत्नागिरी : इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार करुन प्रकल्पाला विरोध केला आहे. केंद्राने पुन्हा निर्णय घेतला असेल तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलतील, त्यांच्या भावना समजून घेतील त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले.केंद्र सरकारने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आपली भूमिका मांडली.  मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर बरीच वर्ष प्रकल्पाचे काम बंद होते. कालच केंद्र सरकारने पुन्हा प्रकल्पाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक आमदार असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, लोकसभेचे सदस्य विनायक राऊत हे पुन्हा एकदा तेथील लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशापद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही.शिवसेनेने पूर्वी निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय होता. जनतेचा विरोध होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलत नाहीत, त्यांच्या भावना समजून घेत नाहीत, तोपर्यंत बोलणे उचित नाही, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पUday Samantउदय सामंत