शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचे मंत्री नितेश राणेंसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:48 IST

किनारपट्टी माहिती असलेला मंत्री मिळाल्याने आशा पल्लवित

रत्नागिरी : जिल्ह्यातील गाळाने भरलेली बंदरे, एलईडी लाइट मासेमारी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी, पारंपरिक-पर्ससीननेट मच्छीमार वाद, डिझेलवरील सबसिडी वेळेवर न मिळणे, मत्स्य दुष्काळ अशा अनेक समस्यांच्या गर्तेत मच्छीमार सापडलेला आहे. आजवर किनारपट्टीशी संबंध नसलेल्या भागात मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्रिपद जात असल्याने या समस्या ‘जैसे थे’ राहिल्या. मात्र, महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्री नितेश राणे यांच्यामुळे सागरी किनारपट्टीची आणि मच्छीमारांच्या समस्यांची माहिती असणारा मंत्री मिळाल्याने मच्छीमारांच्या समस्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील खाड्या, बंदरातील गाळ गेल्या कित्येक वर्षातून उपसला गेला नसल्याने खाड्या व बंदरे गाळाने भरली आहेत. या गाळामुळे मासेमारी नाैकांना समुद्रात ये-जा करणे अवघड हाेत आहे. काही वेळेला अपघाताच्याही समस्या निर्माण हाेतात. त्याचबरोबर पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीननेट यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अंतरावरून वाद सुरू आहे. या वादावर अनेक वेळा ताेडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही.

शासनाकडून सवलतीच्या दरात मासेमारी नौकांना डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, डिझेल खरेदीवर मच्छीमारांना सबसिडी देण्यात येते. ती सबसिडी दोन-दोन वर्षे शासनाकडे थकीत राहत आहे. ही सबसिडी वेळेत मिळण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. परराज्यातील मासेमारी नौकांची घुसखाेरी हे स्थानिक मच्छीमारांसमाेरील माेठी डाेकेदुखी ठरली आहे, तसेच एलईडी लाइटने हाेणाऱ्या मासेमारीमुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. या समस्यांबाबत शासनाने कठाेर निर्णय घेणे गरजेचे आहे.

किनारपट्टीशी निगडित मंत्रीआतापर्यंत खासदार नारायण राणे वगळता मासेमारी व्यवसायाशी नव्हे तर किनाऱ्याशी काहीही संबंध नसलेल्यांकडे मत्स्यव्यवसाय खात्याची धुरा देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून मच्छीमारांच्या समस्या काेणाला कळल्याच नाहीत. मात्र, आता सागरी किनारपट्टीची माहिती असणारे, मच्छीमारांच्या समस्यांची माहिती असणारे आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या समस्या साेडण्याची आशा निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी शहरातील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी मच्छीमारांचा लढा सुरू आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा. तसेच परराज्यातील मासेमारी नौकांपासून सुरू असलेली घुसखोरी थांबविण्यासाठी कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. -नजीर वाडकर, अध्यक्ष, मच्छीमार संघर्ष समिती, रत्नागिरी 

माशांचा ८० टक्के साठा हा किनारपट्टीला म्हणजेच १० ते १२ वावाच्या आतमध्ये असतो. तर पर्ससीन नेट हे त्याबाहेर मासेमारी करतात. त्यामुळे या २० टक्के साठ्यातील मासे मारण्यासाठी पर्ससीन नेट नौकांना किती अंतरावर जाळ्याने शोध घेऊन किती मासे मिळत असतील. त्यामुळे शासनाने पर्ससीन नेट मासेमारीवर ठरावीक अंतराबाबत घातलेली बंदी योग्य आहे का, याचा विचार होणे आवश्यक आहे. -इम्रान मुकादम, चेअरमन, मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी सोसायटी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमारNitesh Raneनीतेश राणे