शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:12 PM

यशकथा : शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे.

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी) 

कोकणी बांधवांप्रमाणे अर्थार्जनासाठी मुंबईची वाट न चोखळता वडिलोपार्जित जमिनीतच शेती करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील माजळ गावचे सुपुत्र सुधीर माजळकर-चव्हाण यांनी घेतला आणि आपल्या कष्टाने हा निर्णय सार्थही ठरवला. शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे. आज वयाच्या सत्तरीच्या आसपास असतानाही त्यांचा शेतीचा ध्यास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. वेगवेगळे प्रयोग व सेंद्रीय शेती करून ते  दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवित आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुधीर माजळकर यांनी मित्रांबरोबर नोकरीसाठी मुंबईकडे न जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आई- वडिल आनंदीत झाले. शेतीबाबतचे धडे त्यांना वडिलांनी दिले. स्वत:च्याच वडिलोपार्जित २० ते २२ एकर जमिनीमध्ये ते विविध प्रकारची पिके फुलवीत आहेत. सहा एकर क्षेत्रावर त्यांनी १,५०० काजूलागवड केली असून, त्यासाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त वेंगुर्ला ४ जातीची व गावठी काजूची लागवड केली आहे. दरवर्षी तीन ते साडेतीन टन काजूचे उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. संकलित केलेला सर्व काजू व्यापाऱ्याला विकत असल्याने पांढऱ्या सोन्याचे रोखीने उत्पन्न मिळत आहे. अडीच एकर क्षेत्रावर आंबा लागवड केली असून, हापूस तसेच विविध जातींची १५० कलमे लावली आहेत. ते आंबा बागेचे वर्षभर संगोपन करीत असले तरी हंगामातील फळे काढण्यासाठी व्यापाऱ्याला देत आहेत. त्यामुळे आंबा पिकातूनही दरवर्षी त्यांना रोख रक्कम प्राप्त होते. पाच एकर क्षेत्रावर ३५० नारळ लावला आहे. बाणवली, टीडीसारखी रोपे लावली असून, हजारोपेक्षा अधिक नारळ विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. नारळाची विक्री करण्यासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही. स्थानिक बाजारपेठेतच नारळ विक्री होते.

माजळकर यांनी पडीक जागेत सागाची एक हजार झाडे लावली असून, सागाची झाडेदेखील नगदी उत्पन्न देणारी आहेत.  दरवर्षी खरीप हंगामात एक एकर शेतीत ते भात लागवड करतात. यातून दोन टन तांदळाचे उत्पन्न ते घेतात. आंबा कलम बागेत त्यांनी २० वर्षांपासून गांडूळ खताची निर्मिती करीत असून दरवर्षी तयार झालेले तीन टन खत ते शेतीसाठी वापरतात यामुळे त्यांची शेती सुपिक झालेली असून उत्पन्नही चांगले मिळत आहे. अतिरिक्त झालेले गांडूळखत ते विक्री करून त्यामाध्यमातूनही पैसे कमवितात.पत्नी व पदवीधर असलेले दोन मुले त्यांच्याबरोबर शेतीमध्य्ो कार्यरत आहेत.

सुधीर माजळकर यांच्या शेतीतील कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या ६९ वर्षीदेखील ते शेतीच्या कामात नित्य व्यग्र असतात. कृषिसेवक, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या शेतात नवनवीन प्रयोग ते करीत असतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी