शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Ganeshotsav 2024: रत्नागिरीतील मयूर भितळे यांच्या चलचित्र देखाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा

By शोभना कांबळे | Updated: September 9, 2024 18:18 IST

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या ...

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भक्तांना पाहण्यासाठी खुला केला आहे. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत (१७ सप्टेंबर) पाहता येणार आहे.मयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली सहा वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी हुबेहूब देखावे त्यांनी केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच केला होता. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनातील प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी गतवर्षी केला होता. त्यांच्या या देखाव्याची प्रशंसाही झाली होती.या चलचित्र देखाव्यातून प्रेरणा घेऊन यंदा भितळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या देखाव्यातून मांडल्या आहेत. कोकणातील शेती आता अनिश्चित झाली आहे. पाऊस लहरी झाल्याने शेती चांगली होईल, याची शाश्वती नाही, तर काही वेळा त्याच्या जमिनीवरच अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून, शेतकऱ्यांची मुले आता रोजगारासाठी गाव सोडून शहरात जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मयूर भितळे यांनी त्यांच्या या व्यथा या चलचित्र देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.मयूर भितळे यांनी अतिशय अल्प कालावधीत हा देखावा तयार केला आहे. यासाठी त्यांना अनिकेत बाणे, मारुती लोहार, सौरभ मांडवकर, अभिजित आलीम यांचे सहकार्य मिळाले, तसेच रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश सुरेश दोरखंडे यांनी विशेष साहाय्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Farmerशेतकरी