शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

निधीअभावी बाजारपूल रखडला

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

चिपळूण शहर : मुंबई, पुणेच्या धर्तीवर पुलाचे काम; शहरातील मुख्य पूल

चिपळूण : शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, मुंबई, पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार आहे. मात्र, या पुलासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी अद्याप प्राप्त न झाल्याने पुलाचे काम मुदतीत होईल की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.१९६०-६१ च्या दरम्यान शहरातील वाशिष्ठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. गोवळकोटसह अन्य गावांना जोडणारा हा शहरातील मुख्य पूल असून, २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. पुलाच्या कामाला निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. १३ जून २०१४मध्ये नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई येथील एका कंपनीला हा पूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. जुन्या बाजारपुलाच्या नजीक नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. नदीमध्ये २४ पाईप्स टाकले जाणार आहेत. हे पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १८ महिन्यात हा पूल पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुंबई-पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार असल्याने शहराच्या विकासात या पुलाच्या माध्यमातून भर पडणार आहे. ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या वाढणाऱ्या महागाईचा विचार करुन पुलाच्या कामाचे बजेटही वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाला हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने ठरवलेल्या मुदतीत हा पूल होईल अथवा कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी अभावी काम रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगर परिषद येथे गेल्या महिन्यात पर्यटनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी पालकमंत्री वायकर यांच्याकडे पुलासाठी मंजूर झालेला निधी लवकरच मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. मंजूर झालेला निधी नगर परिषद प्रशासनाला वेळेत मिळाल्यास पुलाचे कामही ठरलेल्या मुदतीत होईल, या अनुषंगाने निधीसाठी आता खऱ्या अर्थाने पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)अतिवृष्टीत पुलाचे नुकसान : निधी मिळणार कधी?चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या पुलाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यानंतर या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने काम रखडले आहे. हा निधी मिळणार कधी असा सवाल होत आहे.पालकमंत्र्यांना साकडेगोवळकोट येथील पुलाचे काम निधीअभावी रखडले आहे. हा निधी मिळण्यासाठी चिपळूणच्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांना साकडे घातले असून, हा निधी लवकर मिळण्याची मागणी केली आहे.