शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

निधीअभावी बाजारपूल रखडला

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

चिपळूण शहर : मुंबई, पुणेच्या धर्तीवर पुलाचे काम; शहरातील मुख्य पूल

चिपळूण : शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, मुंबई, पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार आहे. मात्र, या पुलासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी अद्याप प्राप्त न झाल्याने पुलाचे काम मुदतीत होईल की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.१९६०-६१ च्या दरम्यान शहरातील वाशिष्ठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. गोवळकोटसह अन्य गावांना जोडणारा हा शहरातील मुख्य पूल असून, २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. पुलाच्या कामाला निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. १३ जून २०१४मध्ये नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई येथील एका कंपनीला हा पूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. जुन्या बाजारपुलाच्या नजीक नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. नदीमध्ये २४ पाईप्स टाकले जाणार आहेत. हे पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १८ महिन्यात हा पूल पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुंबई-पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार असल्याने शहराच्या विकासात या पुलाच्या माध्यमातून भर पडणार आहे. ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या वाढणाऱ्या महागाईचा विचार करुन पुलाच्या कामाचे बजेटही वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाला हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने ठरवलेल्या मुदतीत हा पूल होईल अथवा कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी अभावी काम रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगर परिषद येथे गेल्या महिन्यात पर्यटनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी पालकमंत्री वायकर यांच्याकडे पुलासाठी मंजूर झालेला निधी लवकरच मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. मंजूर झालेला निधी नगर परिषद प्रशासनाला वेळेत मिळाल्यास पुलाचे कामही ठरलेल्या मुदतीत होईल, या अनुषंगाने निधीसाठी आता खऱ्या अर्थाने पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)अतिवृष्टीत पुलाचे नुकसान : निधी मिळणार कधी?चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या पुलाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यानंतर या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने काम रखडले आहे. हा निधी मिळणार कधी असा सवाल होत आहे.पालकमंत्र्यांना साकडेगोवळकोट येथील पुलाचे काम निधीअभावी रखडले आहे. हा निधी मिळण्यासाठी चिपळूणच्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांना साकडे घातले असून, हा निधी लवकर मिळण्याची मागणी केली आहे.