शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

निधीअभावी बाजारपूल रखडला

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

चिपळूण शहर : मुंबई, पुणेच्या धर्तीवर पुलाचे काम; शहरातील मुख्य पूल

चिपळूण : शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, मुंबई, पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार आहे. मात्र, या पुलासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी अद्याप प्राप्त न झाल्याने पुलाचे काम मुदतीत होईल की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.१९६०-६१ च्या दरम्यान शहरातील वाशिष्ठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. गोवळकोटसह अन्य गावांना जोडणारा हा शहरातील मुख्य पूल असून, २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. पुलाच्या कामाला निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. १३ जून २०१४मध्ये नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई येथील एका कंपनीला हा पूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. जुन्या बाजारपुलाच्या नजीक नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. नदीमध्ये २४ पाईप्स टाकले जाणार आहेत. हे पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १८ महिन्यात हा पूल पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुंबई-पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार असल्याने शहराच्या विकासात या पुलाच्या माध्यमातून भर पडणार आहे. ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या वाढणाऱ्या महागाईचा विचार करुन पुलाच्या कामाचे बजेटही वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाला हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने ठरवलेल्या मुदतीत हा पूल होईल अथवा कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी अभावी काम रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगर परिषद येथे गेल्या महिन्यात पर्यटनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी पालकमंत्री वायकर यांच्याकडे पुलासाठी मंजूर झालेला निधी लवकरच मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. मंजूर झालेला निधी नगर परिषद प्रशासनाला वेळेत मिळाल्यास पुलाचे कामही ठरलेल्या मुदतीत होईल, या अनुषंगाने निधीसाठी आता खऱ्या अर्थाने पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)अतिवृष्टीत पुलाचे नुकसान : निधी मिळणार कधी?चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या पुलाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यानंतर या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने काम रखडले आहे. हा निधी मिळणार कधी असा सवाल होत आहे.पालकमंत्र्यांना साकडेगोवळकोट येथील पुलाचे काम निधीअभावी रखडले आहे. हा निधी मिळण्यासाठी चिपळूणच्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांना साकडे घातले असून, हा निधी लवकर मिळण्याची मागणी केली आहे.