शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:11 IST

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतील

चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याला आपला पाठिंबाच आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जालना येथे झालेला लाठीहल्ला अयोग्य असून, पोलिसांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्याचा निषेध करायला हरकत नाही, असे ते म्हणाले.आरपीआयच्या कोकण विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व्हावे, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होऊ नये, यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण बसेल.राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता नसून, नवीन कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे कुणी त्यावर भाष्य केले असेल, तर आमच्या सरकारमध्ये घटना बदलण्याबाबत कोणताच विषय नाही, असेही त्यांनी सांगितले.

पदासाठी जात नाहीआपण ज्या पक्षात जातो त्यांना सत्ता मिळते. याआधी शरद पवारांबरोबर आपण होतो. त्यावेळीही आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्रिपदासाठी आपण कुठल्याही पक्षात जात नाही. सत्तेसाठी आमचे राजकारण नाही, तर मी सत्तेच्या बाजूने जातो आणि तेथे पद मिळते, असेही ते म्हणाले.

अजित पवार स्वत:हून आलेअजित पवार यांना महायुतीत आम्ही आणले नाही. ते स्वत:हूनच आले आणि ताकदीनिशी आले आहेत. इंडियाचा एनडीएवर काही परिणाम होणार नाही आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असेही आठवले म्हणाले.

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतीलआरपीआय केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. राज्यात आम्हाला एक मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. आम्ही अजूनही त्याची प्रतीक्षा करतोय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआयला राज्यात लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले