शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:11 IST

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतील

चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याला आपला पाठिंबाच आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जालना येथे झालेला लाठीहल्ला अयोग्य असून, पोलिसांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्याचा निषेध करायला हरकत नाही, असे ते म्हणाले.आरपीआयच्या कोकण विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व्हावे, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होऊ नये, यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण बसेल.राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता नसून, नवीन कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे कुणी त्यावर भाष्य केले असेल, तर आमच्या सरकारमध्ये घटना बदलण्याबाबत कोणताच विषय नाही, असेही त्यांनी सांगितले.

पदासाठी जात नाहीआपण ज्या पक्षात जातो त्यांना सत्ता मिळते. याआधी शरद पवारांबरोबर आपण होतो. त्यावेळीही आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्रिपदासाठी आपण कुठल्याही पक्षात जात नाही. सत्तेसाठी आमचे राजकारण नाही, तर मी सत्तेच्या बाजूने जातो आणि तेथे पद मिळते, असेही ते म्हणाले.

अजित पवार स्वत:हून आलेअजित पवार यांना महायुतीत आम्ही आणले नाही. ते स्वत:हूनच आले आणि ताकदीनिशी आले आहेत. इंडियाचा एनडीएवर काही परिणाम होणार नाही आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असेही आठवले म्हणाले.

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतीलआरपीआय केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. राज्यात आम्हाला एक मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. आम्ही अजूनही त्याची प्रतीक्षा करतोय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआयला राज्यात लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले