शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:11 IST

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतील

चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याला आपला पाठिंबाच आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जालना येथे झालेला लाठीहल्ला अयोग्य असून, पोलिसांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्याचा निषेध करायला हरकत नाही, असे ते म्हणाले.आरपीआयच्या कोकण विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व्हावे, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होऊ नये, यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण बसेल.राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता नसून, नवीन कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे कुणी त्यावर भाष्य केले असेल, तर आमच्या सरकारमध्ये घटना बदलण्याबाबत कोणताच विषय नाही, असेही त्यांनी सांगितले.

पदासाठी जात नाहीआपण ज्या पक्षात जातो त्यांना सत्ता मिळते. याआधी शरद पवारांबरोबर आपण होतो. त्यावेळीही आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्रिपदासाठी आपण कुठल्याही पक्षात जात नाही. सत्तेसाठी आमचे राजकारण नाही, तर मी सत्तेच्या बाजूने जातो आणि तेथे पद मिळते, असेही ते म्हणाले.

अजित पवार स्वत:हून आलेअजित पवार यांना महायुतीत आम्ही आणले नाही. ते स्वत:हूनच आले आणि ताकदीनिशी आले आहेत. इंडियाचा एनडीएवर काही परिणाम होणार नाही आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असेही आठवले म्हणाले.

लोकसभेच्या दोन, विधानसभेच्या दहा जागा मिळतीलआरपीआय केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. राज्यात आम्हाला एक मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. आम्ही अजूनही त्याची प्रतीक्षा करतोय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआयला राज्यात लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले