शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम

By मेहरून नाकाडे | Updated: December 9, 2023 14:27 IST

बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार

रत्नागिरी : मधूर स्वाद व अविट गोडीने देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही भूरळ घातलेला हापूस आंबा उत्पादन यावर्षी हंगामापूर्वी होईल अशी अपेक्षा हवामानातील बदलाने फोल ठरवली आहे. आॅक्टोबर हीट चांगली जाणवली, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीही सुरू झाली. त्यामुळे आंबा कलमांना मोहर सुरू झाल्याने बागायतदारही सुखावले होते. परंतु नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात पुन्हा बदल झाला.

थंडीच गायब झाली. त्यामुळे मोहर प्रक्रिया थांबली. पालवीचे प्रमाण वाढले असून यावर्षी आंबा हंगाम लांबणार असल्याची शक्यता आहे. परिणामी बागायतदारही धास्तावले आहेत. ढगाळ हवामान, थंडी गायब यामुळे कीड रोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत आहे.रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला व फलोत्पादन लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात १७५३०५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. आंबा व काजू ही दोन पिके जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आहेत. आंबा व काजू पिकाला सुरूवातीच्या टप्प्यात मोहर सुरू झाला मात्र मध्येच थांबला आहे. एकूण मोहर प्रक्रिया जेमतेम १५ टक्केच आहे. अवकाळी पावसानंतर हवेतील उष्मा वाढला व थंडी गायब झाली.ठिकठिकाणी पाऊस झाला. ढगाळ हवामानामुळे बुरशी, कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले. पहिल्या टप्प्यातील मोहराला फळधारणा झाली असून पिक वाचविण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाच्या दृष्टचक्रातून पिक वाचल्यास आंबा मार्चच्या पहिल्या टप्प्यात विक्रीला येईल. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असेल. सध्या पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होवून मोहर येण्यासाठी सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी लागतो.त्यामुळे जानेवारीतच पालवी असलेल्या झाडांना मोहोर येणार आहे. त्यामुळे फळधारणा होवून आंबा एप्रिल-मे मध्येच येण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होईल अशी अपेक्षा होती मात्र थंडीच गायब असल्याने मोहर कसा येणार? हवामानावर आधारित आंबा, काजू पिक असल्याने बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान