शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम

By मेहरून नाकाडे | Updated: December 9, 2023 14:27 IST

बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार

रत्नागिरी : मधूर स्वाद व अविट गोडीने देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही भूरळ घातलेला हापूस आंबा उत्पादन यावर्षी हंगामापूर्वी होईल अशी अपेक्षा हवामानातील बदलाने फोल ठरवली आहे. आॅक्टोबर हीट चांगली जाणवली, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीही सुरू झाली. त्यामुळे आंबा कलमांना मोहर सुरू झाल्याने बागायतदारही सुखावले होते. परंतु नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात पुन्हा बदल झाला.

थंडीच गायब झाली. त्यामुळे मोहर प्रक्रिया थांबली. पालवीचे प्रमाण वाढले असून यावर्षी आंबा हंगाम लांबणार असल्याची शक्यता आहे. परिणामी बागायतदारही धास्तावले आहेत. ढगाळ हवामान, थंडी गायब यामुळे कीड रोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत आहे.रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला व फलोत्पादन लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात १७५३०५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. आंबा व काजू ही दोन पिके जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आहेत. आंबा व काजू पिकाला सुरूवातीच्या टप्प्यात मोहर सुरू झाला मात्र मध्येच थांबला आहे. एकूण मोहर प्रक्रिया जेमतेम १५ टक्केच आहे. अवकाळी पावसानंतर हवेतील उष्मा वाढला व थंडी गायब झाली.ठिकठिकाणी पाऊस झाला. ढगाळ हवामानामुळे बुरशी, कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले. पहिल्या टप्प्यातील मोहराला फळधारणा झाली असून पिक वाचविण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाच्या दृष्टचक्रातून पिक वाचल्यास आंबा मार्चच्या पहिल्या टप्प्यात विक्रीला येईल. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असेल. सध्या पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होवून मोहर येण्यासाठी सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी लागतो.त्यामुळे जानेवारीतच पालवी असलेल्या झाडांना मोहोर येणार आहे. त्यामुळे फळधारणा होवून आंबा एप्रिल-मे मध्येच येण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होईल अशी अपेक्षा होती मात्र थंडीच गायब असल्याने मोहर कसा येणार? हवामानावर आधारित आंबा, काजू पिक असल्याने बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान