शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:17 IST

मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात मांडली.

ठळक मुद्देपाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंततीस वर्षात दहा हजारहून सैनिक भारताने गमावले

राजापूर : मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.रत्नागिरी जिल्ह्यात आप पक्षाची बांधणीसाठी आपण दौऱ्यावर असून काही मित्रपक्षांची तिसरी आघाडी करुन लोकसभेच्या या मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून दोन दिवसांपूर्वी भारतीय हवाईदलाने पाक हद्दीत घुसुन दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी केलेली ठोस कारवाई याबाबत विचारले असता मागील चाळीस वर्षाचा काळ आजच्या स्थितीला जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.

या कालखंडात जागतिक पातळीवरील घटनांचा उल्लेख करीत अमेरिकेने पाकमध्ये कसा दहशतवाद पोसला व त्याचे कसे परिणाम घडत गेले त्यावर विस्तृत माहिती दिली. ड्रग्स, स्मगलिंग व अफुची विक्री यामधुन हे प्रकार घडत असून त्यामध्ये अनेकांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांचे मोठे नेटवर्क पसरले असून ते जोवर उध्वस्त होत नाही तोवर दहशतवाद संपणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले.

सरकार काँग्रेसचे असो वा भाजपाचे असो, काश्मीरचा प्रश्न हा दुर्लक्षित राहिला अशी त्यांनी स्पष्ट भुमिका मांडली. काश्मीरमध्ये मुफ्ती समवेत भाजपचे बनलेले सरकार हे पाप व शाप होता. त्या सरकारमुळे काश्मीरमधील शांतता भंग पावली व पुन्हा तेथे दहशतवाद सुरु झाला, असा आरोप सुधीर सावंत यांनी केला. अशा पापामुळेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला व चाळीसहुन अधिक जवान शहीद झाले. दहशतवाद पोसणाऱ्या पाकला आता कायमची अद्दल घडवावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.जिल्ह्यात आरपीआयचे दोन गट, बहुजन विकास आघाडी वेल्फर पार्टी, बामसेफ यासहित विविध संघटना व आप पक्ष यांची आघाडी होणार असुन ७ मार्चला बैठक पार पडणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढवणार असल्याचे त्यान्नी स्पष्ट केले. रत्नागिरीत पक्ष संघटनाचे काम सुरु असल्याचे सांगताना लांज्याचे रियाज काझी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची त्यांनी माहिती दिली.परराष्ट्र धोरणावरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. कारगिल युध्दात अमेरीकेच्या दबावामुळे भारताने आपल्या सैन्याला सीमा पार करु दिली नव्हती, असा त्यांनी आरोप केला. भारताचा पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटबाबत विचारले असता जिनिव्हा करारानुसार पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटला भारताकडे सुपुर्द करावे लागेल, अशी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्ग