शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:17 IST

मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात मांडली.

ठळक मुद्देपाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंततीस वर्षात दहा हजारहून सैनिक भारताने गमावले

राजापूर : मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.रत्नागिरी जिल्ह्यात आप पक्षाची बांधणीसाठी आपण दौऱ्यावर असून काही मित्रपक्षांची तिसरी आघाडी करुन लोकसभेच्या या मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून दोन दिवसांपूर्वी भारतीय हवाईदलाने पाक हद्दीत घुसुन दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी केलेली ठोस कारवाई याबाबत विचारले असता मागील चाळीस वर्षाचा काळ आजच्या स्थितीला जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.

या कालखंडात जागतिक पातळीवरील घटनांचा उल्लेख करीत अमेरिकेने पाकमध्ये कसा दहशतवाद पोसला व त्याचे कसे परिणाम घडत गेले त्यावर विस्तृत माहिती दिली. ड्रग्स, स्मगलिंग व अफुची विक्री यामधुन हे प्रकार घडत असून त्यामध्ये अनेकांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांचे मोठे नेटवर्क पसरले असून ते जोवर उध्वस्त होत नाही तोवर दहशतवाद संपणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले.

सरकार काँग्रेसचे असो वा भाजपाचे असो, काश्मीरचा प्रश्न हा दुर्लक्षित राहिला अशी त्यांनी स्पष्ट भुमिका मांडली. काश्मीरमध्ये मुफ्ती समवेत भाजपचे बनलेले सरकार हे पाप व शाप होता. त्या सरकारमुळे काश्मीरमधील शांतता भंग पावली व पुन्हा तेथे दहशतवाद सुरु झाला, असा आरोप सुधीर सावंत यांनी केला. अशा पापामुळेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला व चाळीसहुन अधिक जवान शहीद झाले. दहशतवाद पोसणाऱ्या पाकला आता कायमची अद्दल घडवावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.जिल्ह्यात आरपीआयचे दोन गट, बहुजन विकास आघाडी वेल्फर पार्टी, बामसेफ यासहित विविध संघटना व आप पक्ष यांची आघाडी होणार असुन ७ मार्चला बैठक पार पडणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढवणार असल्याचे त्यान्नी स्पष्ट केले. रत्नागिरीत पक्ष संघटनाचे काम सुरु असल्याचे सांगताना लांज्याचे रियाज काझी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची त्यांनी माहिती दिली.परराष्ट्र धोरणावरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. कारगिल युध्दात अमेरीकेच्या दबावामुळे भारताने आपल्या सैन्याला सीमा पार करु दिली नव्हती, असा त्यांनी आरोप केला. भारताचा पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटबाबत विचारले असता जिनिव्हा करारानुसार पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटला भारताकडे सुपुर्द करावे लागेल, अशी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्ग