शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

रत्नागिरी जिल्ह्यात ३ ठिकाणी कासवाच्या घरट्यांची मुख्य स्थळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:47 IST

भारतीय वन्यजीव संस्थेकडून अभ्यास, कासवाची २० टक्के घरटी महाराष्ट्रात

रत्नागिरी : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने २०२३-२४ मध्ये देशभरात केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या अभ्यासाचा पहिला अहवाल वनविभागाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले (समुद्री कासव) कासवांची २० टक्के घरटी असल्याचे समाेर आले आहे. त्यातील मुख्य स्थळे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर येथे असल्याचे अहवालात म्हटले आहे.भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र कासवांची संख्या, त्यांच्या सवयी, घरटे करण्याचे स्थान, घरट्यांमध्ये नव्याने उत्पत्ती होणाऱ्या कासवाचा अभ्यास केला जात आहे. हा प्रकल्प २३-२४ ते २८-२९ पर्यंत देशभरात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या पश्चिम किनारपट्टीवर २०२३-२४ पासून या अभ्यासाला प्रारंभ झाला आहे.या अभ्यासाचा अहवाल राज्य वन विभागाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये २,५८४ घरटी आढळली आहेत. २०२२-२३ मध्ये घरट्यांची संख्या १,३८७ होती. त्यात वाढ झाल्याचे पुढे आले आहे.राज्यातील समुद्रकिनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला. त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी ही घरट्यांची मुख्य स्थळे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

जन्म देण्याचे प्रमाण ६० टक्केसमुद्री कासवांनी २०२२-२३ या वर्षात २,५३,६५२ अंडी घातली. त्यातील १,६०,७१६ अंड्यांतून पिले बाहेर आली. पिलांना यशस्वीरीत्या जन्म देण्याची टक्केवारी ६० आहे.

सर्वाधिक घरटी फेब्रुवारीतकासव घरटी बनविण्यास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरुवात करतात. एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. सर्वाधिक घरटी फेब्रुवारीत तयार होतात. त्याची टक्केवारी ४१.५ टक्के आहे. साधारणतः रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते. एका विणीच्या हंगामात एक ते तीन वेळा साधारणतः २० ते २८ दिवसांच्या अंतराने अंडी घातली जातात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग