शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:32 IST

हे आमचे दुर्दैव

रत्नागिरी : महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत असून, तो मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल शून्य होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे की नाही, तो ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ठरवावा. त्यासाठी आठ कोटी रुपये जिल्हा नियोजनातून देणार आहे. त्यापैकी ३ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहेत, असे अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरीय व जिल्हा परिषद गटस्तरीय ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात नियोजन मंडळाकडून ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च करून मुलांना अमेरिकेला पाठवण्याचे धाडस रत्नागिरी जिल्हा परिषद व नियोजन मंडळाने केले. शेतकऱ्यांची मुले इस्रो, नासाला पाठविण्याचे काम जिल्हा परिषदेने करून रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला ठरला, असेही ते म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.सरपंच आणि ग्रामसेवक ही गाडीची दोन चाके आहेत. ती विश्वासाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गावचा विकास व्हायचा असेल तरी शासनाने ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा उपयोग आपण ग्रामपातळीवर कसा करतो, हे भविष्यातील प्रश्नचिन्ह राहणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. ग्रामपंचायतींना लागेल तेवढा निधी आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व अन्य उपस्थित होते.

हे आमचे दुर्दैवअब्दुल सत्तार गुवाहटीला गेल्याने कृषिमंत्री झाले आणि मी गुवाहटीला गेल्याने उद्योगमंत्री झालो. त्यानंतर मी या जिल्ह्याचा साडेसात वर्षानंतर पालकमंत्री झालो. साडेसात वर्षे स्थानिक पालकमंत्री दिला नाही, हे आमचे दुर्दैव आहे, अशी खंत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत