शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 13:40 IST

विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी डझनभर मंत्र्यांना भेटलो. त्यांना निवेदन देत चर्चा केली. त्याचा पाठपुरावाही नेमाने सुरू आहे. मात्र, यात पाहिजे तसे यश येत नाही, याची खंत आहे. नेते म्हणतात, कोकण आपल्याला आवडतो, कोकणावर आपले विशेष प्रेम आहे. मात्र, त्यांनी विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल, आमदारकीची चिंता नाही. गाळ काढण्यासाठीच्या लढ्यात आपण नेहमीच लोकांसोबत असू, असेही त्यांनी सांगितले.

आमदार निकम म्हणाले की, महापुराबाबत प्रशासनाने काहीही सांगितले, तरी पूर कसा आला, धरणातून पाणी सोडले की नाही, या सर्व बाबींची माहिती नागरिकांना आहे. महापूर पुन्हा येऊ नये, यासाठी जंगलतोड थांबवायला हवी. धरणातील गाळ काढायला हवा. पोफळीपासून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची सुरुवात करावी लागेल. वाशिष्ठी, तसेच शिवनदीत जागोजागी बेटे निर्माण झाली आहेत, ती काढावी लागतील. पावसाळा सुरू होण्यास चार-पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढण्यासाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी जोमाने सुरुवात व्हायला हवी. त्यासाठी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसह डझनभर मंत्र्यांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांच्याकडून सहकार्याचे आश्वासनही मिळाले. मात्र, प्रत्यक्षात कामे सुरू होत नसल्याने लोकांना उपोषणाचा अवलंब करावा लागतोय.

नेते म्हणतात, कोकण आवडतो. कोकणावर प्रेम आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम करता, तेवढे कोकणावर करा, अशी कोपरखळीही आमदार निकम यांनी मारली. उपोषणासाठी कारवाई झाली तरी चालेल, मला आमदारकीची चिंता नाही. चिपळूण आणि परिसर पूरमुक्त होण्यासाठी मी चिपळूणवासीयांच्या पाठी ठामपणे उभा राहणार असल्याचा इशाराही दिला.

गाळ काढण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्राकडेही पाठपुरावा सुरू आहे. यासाठी सहा ते सात बैठका झाल्या. या कामाला कोट्यवधीचा खर्च आहे. त्यासाठी रॉयल्टी न घेता, गाळ काढण्यास गाव स्तरावरच मान्यता द्यायला हवी. तसे प्रस्तावही शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. गाळ काढण्यासाठी लोक आता पेटून उठले आहेत. यापुढे एकसंघ राहण्याची गरज आहे. जनमताचा हा रेटा असाच सुरू ठेवा, मी तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणShekhar Nikamशेखर निकम