शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 13:40 IST

विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी डझनभर मंत्र्यांना भेटलो. त्यांना निवेदन देत चर्चा केली. त्याचा पाठपुरावाही नेमाने सुरू आहे. मात्र, यात पाहिजे तसे यश येत नाही, याची खंत आहे. नेते म्हणतात, कोकण आपल्याला आवडतो, कोकणावर आपले विशेष प्रेम आहे. मात्र, त्यांनी विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल, आमदारकीची चिंता नाही. गाळ काढण्यासाठीच्या लढ्यात आपण नेहमीच लोकांसोबत असू, असेही त्यांनी सांगितले.

आमदार निकम म्हणाले की, महापुराबाबत प्रशासनाने काहीही सांगितले, तरी पूर कसा आला, धरणातून पाणी सोडले की नाही, या सर्व बाबींची माहिती नागरिकांना आहे. महापूर पुन्हा येऊ नये, यासाठी जंगलतोड थांबवायला हवी. धरणातील गाळ काढायला हवा. पोफळीपासून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची सुरुवात करावी लागेल. वाशिष्ठी, तसेच शिवनदीत जागोजागी बेटे निर्माण झाली आहेत, ती काढावी लागतील. पावसाळा सुरू होण्यास चार-पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढण्यासाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी जोमाने सुरुवात व्हायला हवी. त्यासाठी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसह डझनभर मंत्र्यांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांच्याकडून सहकार्याचे आश्वासनही मिळाले. मात्र, प्रत्यक्षात कामे सुरू होत नसल्याने लोकांना उपोषणाचा अवलंब करावा लागतोय.

नेते म्हणतात, कोकण आवडतो. कोकणावर प्रेम आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम करता, तेवढे कोकणावर करा, अशी कोपरखळीही आमदार निकम यांनी मारली. उपोषणासाठी कारवाई झाली तरी चालेल, मला आमदारकीची चिंता नाही. चिपळूण आणि परिसर पूरमुक्त होण्यासाठी मी चिपळूणवासीयांच्या पाठी ठामपणे उभा राहणार असल्याचा इशाराही दिला.

गाळ काढण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्राकडेही पाठपुरावा सुरू आहे. यासाठी सहा ते सात बैठका झाल्या. या कामाला कोट्यवधीचा खर्च आहे. त्यासाठी रॉयल्टी न घेता, गाळ काढण्यास गाव स्तरावरच मान्यता द्यायला हवी. तसे प्रस्तावही शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. गाळ काढण्यासाठी लोक आता पेटून उठले आहेत. यापुढे एकसंघ राहण्याची गरज आहे. जनमताचा हा रेटा असाच सुरू ठेवा, मी तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणShekhar Nikamशेखर निकम