शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 13:40 IST

विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी डझनभर मंत्र्यांना भेटलो. त्यांना निवेदन देत चर्चा केली. त्याचा पाठपुरावाही नेमाने सुरू आहे. मात्र, यात पाहिजे तसे यश येत नाही, याची खंत आहे. नेते म्हणतात, कोकण आपल्याला आवडतो, कोकणावर आपले विशेष प्रेम आहे. मात्र, त्यांनी विकासकामातून पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम दाखविले, तेवढे कोकणावर दाखवायला हवे, असे सांगत, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल, आमदारकीची चिंता नाही. गाळ काढण्यासाठीच्या लढ्यात आपण नेहमीच लोकांसोबत असू, असेही त्यांनी सांगितले.

आमदार निकम म्हणाले की, महापुराबाबत प्रशासनाने काहीही सांगितले, तरी पूर कसा आला, धरणातून पाणी सोडले की नाही, या सर्व बाबींची माहिती नागरिकांना आहे. महापूर पुन्हा येऊ नये, यासाठी जंगलतोड थांबवायला हवी. धरणातील गाळ काढायला हवा. पोफळीपासून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची सुरुवात करावी लागेल. वाशिष्ठी, तसेच शिवनदीत जागोजागी बेटे निर्माण झाली आहेत, ती काढावी लागतील. पावसाळा सुरू होण्यास चार-पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढण्यासाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी जोमाने सुरुवात व्हायला हवी. त्यासाठी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसह डझनभर मंत्र्यांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांच्याकडून सहकार्याचे आश्वासनही मिळाले. मात्र, प्रत्यक्षात कामे सुरू होत नसल्याने लोकांना उपोषणाचा अवलंब करावा लागतोय.

नेते म्हणतात, कोकण आवडतो. कोकणावर प्रेम आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रावर जेवढे प्रेम करता, तेवढे कोकणावर करा, अशी कोपरखळीही आमदार निकम यांनी मारली. उपोषणासाठी कारवाई झाली तरी चालेल, मला आमदारकीची चिंता नाही. चिपळूण आणि परिसर पूरमुक्त होण्यासाठी मी चिपळूणवासीयांच्या पाठी ठामपणे उभा राहणार असल्याचा इशाराही दिला.

गाळ काढण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्राकडेही पाठपुरावा सुरू आहे. यासाठी सहा ते सात बैठका झाल्या. या कामाला कोट्यवधीचा खर्च आहे. त्यासाठी रॉयल्टी न घेता, गाळ काढण्यास गाव स्तरावरच मान्यता द्यायला हवी. तसे प्रस्तावही शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. गाळ काढण्यासाठी लोक आता पेटून उठले आहेत. यापुढे एकसंघ राहण्याची गरज आहे. जनमताचा हा रेटा असाच सुरू ठेवा, मी तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणShekhar Nikamशेखर निकम