शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Ratnagiri: लोटे एमआयडीसी स्फाेटाने हादरली; कामगार ठार, आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:13 IST

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्याेगिक वसाहत रविवारी स्फाेटांनी हादरली. लासा सुपरजिनेरिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झाली नाही. तर, काही तासांच्या अंतराने ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीत रिॲक्टरचा स्फाेट झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, अन्य एका कामगाराला ऐराेली येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.दिलीप दत्तात्रय निचिते (४७, सध्या रा. खेड, मूळ रा. वालशेत, ता. शहापूर, ठाणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अनंत शांताराम खरपडे (४८, सध्या रा. खेड, मूळ रा. आबिटघर, ता. वाडा, पालघर) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला लासा सुपर जिनेरिक कंपनीत अचानक भीषण आग लागली. आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असले तरी, संपूर्ण कंपनी अवघ्या दोन तासांत जळून खाक झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या.

ॲक्विला ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारी २:४५ वाजण्याच्या दरम्यान रिॲक्टरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार गंभीररीत्या होरपळले आहेत. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, यामधील दिलीप निचिते यांना ऐराेली येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या अनंत खरपडे यांना ऐराेली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल झाले हाेते. दोन्ही दुर्घटनांचा सखोल तपास सुरू आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरया सलग घडलेल्या दोन दुर्घटनांमुळे लोटे औद्याेगिक वसाहतीतील सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. या रासायनिक कारखान्यांमधील अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे कामगारांचे आणि स्थानिकांचे जीव धोक्यात येत आहेत.

ज्या दोन कंपन्यांमध्ये दुर्घटना झाली त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेले कोणतेही नियम पाळले जात नव्हते. रुग्णवाहिका आणि फायर सेफ्टीचे नियमही त्या ठिकाणी पाळले गेले नाहीत. जखमी कामगारांना दुचाकीवरून न्यावे लागले हे दुर्दैवी आहे. या दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे. - चंद्रकांत चाळके, सरपंच, लाेटे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगMIDCएमआयडीसी