शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:06 IST

सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे

रत्नागिरी - मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, 1960-66 दरम्यान मुंबईत मराठी माणूस 60 टक्के होता तर आज मराठी माणूस 18 टक्के आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. 28 कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर टीका केली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की. मागील निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग 5 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले 

तर उद्धव ठाकरेंचे भाषण साडे पंधरा मिनिटेच असतं. भाषणात विचार नाही तर अविचार मांडले जातात. कोकणासाठी काय केले, कोकणासाठी शिवसेनेचं योगदान काहीच नाही. विकास आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच जुळणार नाही असा प्रहार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ही प्रचंड गर्दी पाहून 23 मेच्या निकालाची वाट न पाहता आजच विजय झाल्यासारखा भासतंय  शिवसैनिकांचा आणि भाजपाचा आतमधून निलेश राणेंना पाठिंबा आहे. या निवडणुकीत आमची लढत कोणासोबत नाही, तेवढ्या तोडीचा माणूस आमच्यासमोर नाही. ही एकतर्फी निवडणूक आहे. 23 मे ला आनंद व्यक्त करण्यासाठी तयार रहा. तुम्ही प्रचारक आहात. उन्हाळ्यात फ्रीजची गरज आहे. त्यामुळे फ्रीज निशाणी घराघरात पोहचवा, परिवर्तन साध्य करण्यासाठी मतदान करा. मतदानाची प्रोत्साहित करा असं आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.  

तसेच पाच वर्षात विनायक राऊतांनी 1 कोटीचं काम तरी केलं का ? पंतप्रधान ग्रामपंचायत रस्ता योजनाही खासदाराला माहित नाही. जिल्हा परिषदेत आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. निलेशने 138 कोटी पाच वर्षात आणले होते. पाच वर्षात काय केलं हे सांगून मत मागावी. विनायक राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही. वडापाव हा लोकसभेत मांडण्याचा विषय आहे का? एसएससीला दोनदा नापास झालेल्या माणसाला लोकसभेत पाठवलं ही लोकांची चूक आहे. नारायण राणेंना शिव्या घालायचा हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना दिला आहे अशी टीका राणे यांनी विनायक राऊंतांवर केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019