शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 12:06 IST

सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे

रत्नागिरी - मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, 1960-66 दरम्यान मुंबईत मराठी माणूस 60 टक्के होता तर आज मराठी माणूस 18 टक्के आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. 28 कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर टीका केली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की. मागील निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग 5 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले 

तर उद्धव ठाकरेंचे भाषण साडे पंधरा मिनिटेच असतं. भाषणात विचार नाही तर अविचार मांडले जातात. कोकणासाठी काय केले, कोकणासाठी शिवसेनेचं योगदान काहीच नाही. विकास आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच जुळणार नाही असा प्रहार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. 

दरम्यान, निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ही प्रचंड गर्दी पाहून 23 मेच्या निकालाची वाट न पाहता आजच विजय झाल्यासारखा भासतंय  शिवसैनिकांचा आणि भाजपाचा आतमधून निलेश राणेंना पाठिंबा आहे. या निवडणुकीत आमची लढत कोणासोबत नाही, तेवढ्या तोडीचा माणूस आमच्यासमोर नाही. ही एकतर्फी निवडणूक आहे. 23 मे ला आनंद व्यक्त करण्यासाठी तयार रहा. तुम्ही प्रचारक आहात. उन्हाळ्यात फ्रीजची गरज आहे. त्यामुळे फ्रीज निशाणी घराघरात पोहचवा, परिवर्तन साध्य करण्यासाठी मतदान करा. मतदानाची प्रोत्साहित करा असं आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.  

तसेच पाच वर्षात विनायक राऊतांनी 1 कोटीचं काम तरी केलं का ? पंतप्रधान ग्रामपंचायत रस्ता योजनाही खासदाराला माहित नाही. जिल्हा परिषदेत आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. निलेशने 138 कोटी पाच वर्षात आणले होते. पाच वर्षात काय केलं हे सांगून मत मागावी. विनायक राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही. वडापाव हा लोकसभेत मांडण्याचा विषय आहे का? एसएससीला दोनदा नापास झालेल्या माणसाला लोकसभेत पाठवलं ही लोकांची चूक आहे. नारायण राणेंना शिव्या घालायचा हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना दिला आहे अशी टीका राणे यांनी विनायक राऊंतांवर केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019