शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:41 IST

गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

ठळक मुद्देजगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना वरदान, १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यात यश

अरूण आडिवरेकर रत्नागिरी : गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आजवर या रूग्णवाहिका ५ हजार ८११ अपघातस्थळी धावल्या असून, १२ हजार ४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.नरेंद्रचार्य महाराजांनी भाविकांना व देणगीदारांना आवाहन केले. त्यातून २७ रुग्णवाहिका संस्थानला दान मिळाल्या. त्या आधारावर २०११पासून ही सेवा सत्यात आली. तेव्हापासून ती रात्रंदिवस, अखंड २४ तास सुरू आहे. सेवा पूर्णपणे मोफत सुरू ठेवली असून, जखमींकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. गाड्याचे इंधन, त्यांची देखभाल व चालकांचा पगार सारे संस्थान करते. वर्षाला साधारण ६० ते ७० लाख रुपये या सेवेवर खर्च होत असतात. हे कार्यदेखील भाविकांनी दिलेल्या देणग्यातून सुरू आहे.सुरूवातीला मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढत राज्याच्या हद्दीतील मुंवई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा व पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर सुरू आहे. अपघातातील जखमींसाठी या रुग्णवाहिका जणू देवदूतच बनल्या आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५,८११ अपघातस्थळी धावल्या आहेत. तसेच तेथील १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एकतर अरुंद रस्ता, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार वा तीव्र चढ असलेला हा मार्ग आहे. वाहनांचा वेगही अपघाताचे मोठे कारण ठरत आहे. या महामार्गावर महाराष्ट्रच्या हद्दीत आजपर्यंत १,५२९ अपघात झाले, त्यात ३,७१५ जण जखमी झाले आहेत. 

समाधान मिळते२००९पासून चालक म्हणून काम करत आहे. माझ्या कामाला वेळ नाही, रात्री-अपरात्री केव्हाही निघावे लागते. जखमींना पाहून मनाला खूप वेदना होतात. तरीही मन घट्ट करून त्यांना धीर देतो. आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समाधान मिळते, मन:शांती मिळते.-धनेश शिवाजी केतकर, चालक 

दहा मिनिटात मदतखड्ड्याचा अंदाज न आल्याने वांद्री येथे मी व माझी पत्नी स्नेहा दुचाकीवरून पडून जखमी झालो. पत्नी बेशुद्ध पडली. कोणीतरी सांगितले, थांबा संस्थानची रूग्णवाहिका येईल आणि केवळ दहा मिनिटातच गाडी आली. त्यामुळे माझ्या पत्नीवर उपचार होऊन तिचे प्राण वाचले.- संदीप बोरसुतकर, अपघातग्रस्त

 

पाचही मार्गावर मदतकार्यपाचही महामार्गावरील रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी आहे. मुंबई-गोवा महामार्ग- ३,७१५. मुंबई - आग्रा महामार्ग- ३,७४४. मुंबई-हैदराबाद महामार्ग -१,८७५, मुंबई- अहमदाबाद महामार्ग- २,१२३, पुणे-बंगलोर महामार्ग-९९३. अशातऱ्हेने एकूण ५,८११ अपघातात १२,४५० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी