शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:41 IST

गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

ठळक मुद्देजगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना वरदान, १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यात यश

अरूण आडिवरेकर रत्नागिरी : गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आजवर या रूग्णवाहिका ५ हजार ८११ अपघातस्थळी धावल्या असून, १२ हजार ४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.नरेंद्रचार्य महाराजांनी भाविकांना व देणगीदारांना आवाहन केले. त्यातून २७ रुग्णवाहिका संस्थानला दान मिळाल्या. त्या आधारावर २०११पासून ही सेवा सत्यात आली. तेव्हापासून ती रात्रंदिवस, अखंड २४ तास सुरू आहे. सेवा पूर्णपणे मोफत सुरू ठेवली असून, जखमींकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. गाड्याचे इंधन, त्यांची देखभाल व चालकांचा पगार सारे संस्थान करते. वर्षाला साधारण ६० ते ७० लाख रुपये या सेवेवर खर्च होत असतात. हे कार्यदेखील भाविकांनी दिलेल्या देणग्यातून सुरू आहे.सुरूवातीला मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढत राज्याच्या हद्दीतील मुंवई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा व पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर सुरू आहे. अपघातातील जखमींसाठी या रुग्णवाहिका जणू देवदूतच बनल्या आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५,८११ अपघातस्थळी धावल्या आहेत. तसेच तेथील १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एकतर अरुंद रस्ता, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार वा तीव्र चढ असलेला हा मार्ग आहे. वाहनांचा वेगही अपघाताचे मोठे कारण ठरत आहे. या महामार्गावर महाराष्ट्रच्या हद्दीत आजपर्यंत १,५२९ अपघात झाले, त्यात ३,७१५ जण जखमी झाले आहेत. 

समाधान मिळते२००९पासून चालक म्हणून काम करत आहे. माझ्या कामाला वेळ नाही, रात्री-अपरात्री केव्हाही निघावे लागते. जखमींना पाहून मनाला खूप वेदना होतात. तरीही मन घट्ट करून त्यांना धीर देतो. आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समाधान मिळते, मन:शांती मिळते.-धनेश शिवाजी केतकर, चालक 

दहा मिनिटात मदतखड्ड्याचा अंदाज न आल्याने वांद्री येथे मी व माझी पत्नी स्नेहा दुचाकीवरून पडून जखमी झालो. पत्नी बेशुद्ध पडली. कोणीतरी सांगितले, थांबा संस्थानची रूग्णवाहिका येईल आणि केवळ दहा मिनिटातच गाडी आली. त्यामुळे माझ्या पत्नीवर उपचार होऊन तिचे प्राण वाचले.- संदीप बोरसुतकर, अपघातग्रस्त

 

पाचही मार्गावर मदतकार्यपाचही महामार्गावरील रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी आहे. मुंबई-गोवा महामार्ग- ३,७१५. मुंबई - आग्रा महामार्ग- ३,७४४. मुंबई-हैदराबाद महामार्ग -१,८७५, मुंबई- अहमदाबाद महामार्ग- २,१२३, पुणे-बंगलोर महामार्ग-९९३. अशातऱ्हेने एकूण ५,८११ अपघातात १२,४५० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी