शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:41 IST

गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

ठळक मुद्देजगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रूग्णवाहिका ठरतायंत त्यांच्यासाठी जीवनदायिनी!रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना वरदान, १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यात यश

अरूण आडिवरेकर रत्नागिरी : गेल्या पाच-दहा वर्षांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी एखादे वाहन असलेल्या घरात आता चार-पाच दुचाकी, एक-दोन चारचाकी झाल्या आहेत. सारे रस्ते, महामार्ग कमी पडावेत एवढी अवस्था आहे. त्याउलट रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. एवढी वाहने पेलण्याची क्षमता आपल्याकडील उपलब्ध रस्त्यामध्ये नाही. सारे रस्ते खराब आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

अपघातानंतर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आजवर या रूग्णवाहिका ५ हजार ८११ अपघातस्थळी धावल्या असून, १२ हजार ४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत.नरेंद्रचार्य महाराजांनी भाविकांना व देणगीदारांना आवाहन केले. त्यातून २७ रुग्णवाहिका संस्थानला दान मिळाल्या. त्या आधारावर २०११पासून ही सेवा सत्यात आली. तेव्हापासून ती रात्रंदिवस, अखंड २४ तास सुरू आहे. सेवा पूर्णपणे मोफत सुरू ठेवली असून, जखमींकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात नाहीत. गाड्याचे इंधन, त्यांची देखभाल व चालकांचा पगार सारे संस्थान करते. वर्षाला साधारण ६० ते ७० लाख रुपये या सेवेवर खर्च होत असतात. हे कार्यदेखील भाविकांनी दिलेल्या देणग्यातून सुरू आहे.सुरूवातीला मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेली ही सेवा टप्प्याटप्प्याने वाढत राज्याच्या हद्दीतील मुंवई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा व पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर सुरू आहे. अपघातातील जखमींसाठी या रुग्णवाहिका जणू देवदूतच बनल्या आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ३१ मार्च २०१९पर्यंत या २७ रुग्णवाहिका ५,८११ अपघातस्थळी धावल्या आहेत. तसेच तेथील १२,४५० जखमींचे प्राण वाचविण्यास सहाय्यभूत ठरल्या आहेत. मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एकतर अरुंद रस्ता, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार वा तीव्र चढ असलेला हा मार्ग आहे. वाहनांचा वेगही अपघाताचे मोठे कारण ठरत आहे. या महामार्गावर महाराष्ट्रच्या हद्दीत आजपर्यंत १,५२९ अपघात झाले, त्यात ३,७१५ जण जखमी झाले आहेत. 

समाधान मिळते२००९पासून चालक म्हणून काम करत आहे. माझ्या कामाला वेळ नाही, रात्री-अपरात्री केव्हाही निघावे लागते. जखमींना पाहून मनाला खूप वेदना होतात. तरीही मन घट्ट करून त्यांना धीर देतो. आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समाधान मिळते, मन:शांती मिळते.-धनेश शिवाजी केतकर, चालक 

दहा मिनिटात मदतखड्ड्याचा अंदाज न आल्याने वांद्री येथे मी व माझी पत्नी स्नेहा दुचाकीवरून पडून जखमी झालो. पत्नी बेशुद्ध पडली. कोणीतरी सांगितले, थांबा संस्थानची रूग्णवाहिका येईल आणि केवळ दहा मिनिटातच गाडी आली. त्यामुळे माझ्या पत्नीवर उपचार होऊन तिचे प्राण वाचले.- संदीप बोरसुतकर, अपघातग्रस्त

 

पाचही मार्गावर मदतकार्यपाचही महामार्गावरील रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी आहे. मुंबई-गोवा महामार्ग- ३,७१५. मुंबई - आग्रा महामार्ग- ३,७४४. मुंबई-हैदराबाद महामार्ग -१,८७५, मुंबई- अहमदाबाद महामार्ग- २,१२३, पुणे-बंगलोर महामार्ग-९९३. अशातऱ्हेने एकूण ५,८११ अपघातात १२,४५० जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयRatnagiriरत्नागिरी