शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आरक्षण घेऊ ते मराठा म्हणूनच घेऊ, चिपळुणातील क्षत्रिय मराठा समाजाची एकमुखाने मागणी

By संदीप बांद्रे | Updated: January 17, 2024 17:56 IST

चिपळूण : कोकणात मराठा कुणबी समाजात वाद नाहीत. येथील जाती व्यवस्था, रितभात वेगळी आहे. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला ...

चिपळूण : कोकणात मराठा कुणबी समाजात वाद नाहीत. येथील जाती व्यवस्था, रितभात वेगळी आहे. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला हवे. मराठ्यांचे कुणबीकरण केल्यास भविष्यात मराठा जातच नष्ट होईल. यातून कोणत्याही जातीला कमी लेखण्याचा हेतू नाही. त्यामुळे शासनाने कोकणातील मराठ्यांना मराठा म्हणून टिकणारे आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी चिपळूणात झालेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या कोकण मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.मराठा आरक्षणाबाबत समाजात जागृती होण्यासाठी शहरातील भैरी मंदिराजवळील मैदानात बुधवारी कोकण प्रांत मराठा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासह रत्नागिरी जिल्ह्यासह सिधुदुर्ग, रायगड, मुंबई, कोल्हापूर, येथील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात सुधीर राजेभोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतिहास सांगितला. मेळाव्याचे समन्वयक राजन घाग म्हणाले, कोकणातील मराठा समाज स्वाभीमानी आहे. आम्ही वेगळी भूमिका घेतरी तरी समाजात फूट पाडण्याचा हेतू नाही. ज्यांना कुणबी म्हणून दाखले हवेत, त्यांनी ते स्विकारावेत, त्याला आमचा विरोध नाही. मात्र शासनाने आम्हाला टिकणारे आरक्षण मराठा म्हणूनच द्यावे. ओसीबीत ३५१ जातींचा समावेश असल्याने त्यातच मराठा समाजाला आरक्षण दिल्यास लोकसंख्येच्या तुलनेने या समाजाला न्याय मिळणार नाही. कुणबी म्हणून आरक्षण मिळाल्यास तिसऱ्या पिढीत मराठा जात नष्ट होईल.यानंतर मराठा आरक्षणाचे अभ्यासक व मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी तपशिलवार माहिती दिली. ते म्हणाले की, सोशल मिडीयावर मराठा समाज आरक्षणाबात संभ्रम करणारे लेखन करू नये. ओबीसीतील ठरावीक जातीच मराठ्यांना विरोध करीत आहेत. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्याने आरक्षणात असलेली दरी काही प्रमाणात भरून निघाली. हे आंदोलनाचे यश मानावे लागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चार पर्याय आहेत. मराठा कुणबी प्रमाणातपत्र घेतल्यास ओबीसीतून आरक्षण मिळू शकेल. खुल्या प्रवर्गातील १० टक्के राखीव असलेल्या इडब्ल्यूएस मधूनही आरक्षण घेता येईल. या १० टक्केत ८ टक्केचा लाभ मराठा समाजाला मिळतो आहे. गायकवाड समितीने मराठा आरक्षणाबाबत ३८०० पानांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यातील काही तांत्रिक बाबींवर न्यायालयाने आक्षेप घेतल्याने तेथे आरक्षण मिळाले नाही. मागासवर्ग आयोगाच्या आधारे समाजाचे मागासलेपण सिद्ध करून आरक्षण मिळवावे लागेल. त्यासाठी आगामी कालावधीत होणाऱ्या सर्व्हेक्षणात समाज बांधवांना जाणीवपुर्वक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुर्वी मराठा समाजातील लोकांच्या शेकडो एकर जमिनी असायच्या. आता त्या गुंठेवारीत आल्या आहेत. मराठा समाजाने आपली भूमी जपली पाहिजे, ती विकता कामा नये. मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात मागासलेपण असून लोकसंख्येनुसार आरक्षण मिळायला हवे. यापुढील कालावधीत समाजातील प्रगल्भ लोकांनी समाज पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही केले.या मेळाव्यास माजी मंत्री रविंद्र माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, संजय खानविलकर, संकेत साळवी, अविश कदम, अजित साळवी, निखील साळवी, बाळा कदम, रामदास राणे, बळीराम शिंदे, अरविंद चव्हाण, चित्रा चव्हाण, मधूकर दळवी, चंद्रकांत मोरे, नेहा गावकर, शेखर पालांडे, तुषार कागले, दिलीप पाटील,  अॅड. अभिजीत सावंत यांच्यासह कोकणातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षण