शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 5:21 PM

दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

ठळक मुद्दे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी दिल्लीतील विद्यार्थी मारहाणप्रकरणी जोरदार टीका

दापोली : दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.दिल्ली येथील जेएनयु प्रकरणात भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कोणताही हात नसून, यामागे डाव्या पक्षांचा हात आहे. प्रकरणातून डाव्या विद्यार्थी संघटनांनी दहशतवादी कृत्य केले आहे, डाव्या संघटनांना देशामध्ये दहशत आणि रक्तपात घडवून आणायचं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य देशातील विविध भागात केले जात आहे. डाव्या संघटनांचा हा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही, केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे त्यांनी सांगितले.

जेएनयु प्रकरणात हस्तक्षेप केला असता तर विरोधकांनी आमच्यावर टीका केली असती, आता या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून, बुरखाधारी लोकांनी मारहाण केली आहे. त्यामुळे हल्लेखोर कोण होते हे कळू शकले नसले नाही. परंतु लवकरच त्यांचा चेहरा समोर येईल व त्यांना कठोर शासन होईल, असेही माधव भंडारी म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात सर्वत्र विरोध होत असताना भाजपकडून नागरिकत्व सुधारणा कायदा कसा योग्य आहे, याबद्दल ठिकाणी सभा घेऊन जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. माधव भंडारी यांनी सीएए, एनआरसी यावर प्रबोधन केले. माधव भंडारी यांच्या जाहीर सभेला दापोली तालुक्यातील सर्वच जाती, धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.शंकांचे निरसन नाहीचएनआरसी व एसएससी कायदा काय आहे, याचे फायदे काय आहेत, याबद्दल माधव भंडारी यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांनी सीएए व एनआरसी याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही. 

टॅग्स :jnu attackजेएनयूBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी