शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:31 IST

जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीतील धोकादायक धरणांमधील पाणी सोडणारजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

रत्नागिरी : जिथे गळतीमुळे धरणांना धोका उद्भवू शकतो, अशा धरणांमधील पाणी कालव्यांमधून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणांची तत्काळ पाहणी करून हा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी लोकांना कल्पना देऊनच या हालचाली केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला दिली.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे आता अन्य धरणांबाबतही प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अशी दुर्घटना भविष्यात कोठेही घडू नये, यासाठी काही तातडीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. पाऊस पडत असल्याने सद्यस्थितीत कोणत्याही धरणाची दुरूस्ती शक्य नाही.

त्यामुळे आता जी धरणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशा धरणांमधील पाणी सोडले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांची डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन असते. जिल्ह्यातील सर्व धरणांची पाहणी करण्याची सूचना या समितीला देण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.धोकादायक ठिकाणचे पुनर्वसनजिथे जिथे धरण क्षेत्रात लोकवस्ती आहे आणि जिला धोका होऊ शकतो, अशा ठिकाणच्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावरही भर दिला जाईल. मुळात त्यांच्या काही अडचणी आहेत का? त्यांना पुनर्वसनासाठी जागा देऊन झाली आहे का, हे तपासून लोकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी