शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 15:39 IST

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे.

रत्नागिरी : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वात मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या इमारतीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टोकन म्हणून ही रक्कम दिल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून याठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.या इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल, तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या इमारतीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत