शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

रत्नागिरीत उभारणार राज्यातील सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत, मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 15:39 IST

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे.

रत्नागिरी : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वात मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या इमारतीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, टोकन म्हणून ही रक्कम दिल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी आणि जिल्हाभरातून याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी यादृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून याठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.या इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल, तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या इमारतीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत