शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:55 IST

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील २८ गावांमधील क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या गावांपैकी संगमेश्वर तालुक्यातील ३ गावांसाठी ५० कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला असून, यापूर्वी या तालुक्यातील २ गावांसाठी ३३ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.

दोन्ही तालुक्यांतील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी २०२० अखेर आली होती. तिचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील निनावे आणि दखीन या गावांसाठी ३३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ एवढा मोबदला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता महिनाभरात पुन्हा या तालुक्यातील जंगलवाडी, मेढेतर्फे देवळे आणि करंजारी या आणखी तीन गावांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या आठवड्यात ५० कोटींचा मोबदला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या पाच गावांसाठी आलेल्या ८३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ रुपये मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या गावांमधील खातेदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खातेदारांच्या खात्यावर त्यांचा मोबदला जमा होणार आहे.

- रत्नागिरी - नागपूर महामार्ग चाैपदरीकरणात संगमेश्वरमधील १३ गावे आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ अशा एकूण २८ गावांचा समावेश आहे.

- ३४ हेक्टर ३७ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, ३ हेक्टर ३९ आर इतके क्षेत्र संपादन करावयाचे आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील ८९ हेक्टर ९८ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, १ हेक्टर १० आर एवढ्या क्षेत्राचे संपादन बाकी आहे.

- संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फे देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांचा समावेश असून, रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांची वाडी, खेडशी, पानवळ, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १५ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गnagpurनागपूर