शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:55 IST

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील २८ गावांमधील क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या गावांपैकी संगमेश्वर तालुक्यातील ३ गावांसाठी ५० कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला असून, यापूर्वी या तालुक्यातील २ गावांसाठी ३३ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका मोबदला जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.

दोन्ही तालुक्यांतील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी २०२० अखेर आली होती. तिचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील निनावे आणि दखीन या गावांसाठी ३३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ एवढा मोबदला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता महिनाभरात पुन्हा या तालुक्यातील जंगलवाडी, मेढेतर्फे देवळे आणि करंजारी या आणखी तीन गावांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या आठवड्यात ५० कोटींचा मोबदला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या पाच गावांसाठी आलेल्या ८३ कोटी ६४ लाख ८६ हजार ५३४ रुपये मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या गावांमधील खातेदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खातेदारांच्या खात्यावर त्यांचा मोबदला जमा होणार आहे.

- रत्नागिरी - नागपूर महामार्ग चाैपदरीकरणात संगमेश्वरमधील १३ गावे आणि रत्नागिरी तालुक्यातील १५ अशा एकूण २८ गावांचा समावेश आहे.

- ३४ हेक्टर ३७ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, ३ हेक्टर ३९ आर इतके क्षेत्र संपादन करावयाचे आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील ८९ हेक्टर ९८ आर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले असून, १ हेक्टर १० आर एवढ्या क्षेत्राचे संपादन बाकी आहे.

- संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फे देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांचा समावेश असून, रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांची वाडी, खेडशी, पानवळ, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १५ गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गnagpurनागपूर