शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

रत्नागिरीतील 'या' गावात पावसाळ्यातही अविरत उडतोय गरम पाण्याचा फवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:42 IST

गरम पाणी कसे लागले, याचा उलगडा अजून झालेला नाही

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील कोकरे-घाणेकरवाडी येथे दोन वर्षांपूर्वी खुदाई केलेल्या बोअरवेलला लागलेले गरम पाण्याचे झरे आजही निरंतर प्रवाहित आहेत. पावसाळ्याच्या दिवसांतही या बाेअरवेलमधून गरम पाणी वाहत आहे. ही बाेअरवेल तरुणांसह पर्यटकांनाही आकर्षित करू लागली आहे. अनेक जण या परिसरात स्नानाचा आनंद लुटत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाचा विकास झाल्यास पर्यटक येथे भेटी देतील, अशी आशा जमीन मालक संजय परशुराम दळवी यांनी व्यक्त केली आहे.संजय दळवी यांनी घर बांधण्यासाठी कोकरे-घाणेकरवाडी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीमध्ये ३० मार्च २०२१ रोजी ते बोअरवेल मारत होते. जवळपास १२० फुटांवर खुदाई करताच पाणी लागले. मात्र, भविष्यात ते पाणी अपुरे पडू नये यासाठी पुन्हा १५ फुटांवर खोल त्यांनी खुदाई केली. हे काम सुरू असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास या बोअरवेलमधून उकळते गरम पाण्याचे फवारे बाहेर पडू लागले. जमिनीपासून सुमारे ५ ते ७ फूट उंचीपर्यंत ६ इंची पाइपमधून कूपनलिकेतून गरम पाणी वाहू लागल्याचे समजताच संजय दळवी आणि उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी याठिकाणी भेट दिली. शासकीय अधिकारी व भूगर्भ शास्त्रज्ञ यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, या बाेअरवेलला गरम पाणी कसे लागले, याचा उलगडा अजून झालेला नाही.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली व राजवाडी, दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कुंडांमध्ये गरम पाण्याचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. संजय दळवी यांच्या बोअरवेललाही अशा प्रकारेच गरम पाण्याचे झरे आजही निरंतर वाहत आहेत. दळवी कुटुंबीय या शेतजमिनीत घर बांधणार होते. मात्र, येथे गरम पाण्याचे झरे लागल्याने त्यांनी हा निर्णय बदलला आहे.

गेली दोन वर्षे संजय दळवी यांच्या जमिनीतील बोरअवेलच्या पाण्यात येथील तरुण व ग्रामस्थ स्नान करीत आहेत. या पाण्याचा कोणालाही कसलाही त्रास झालेला नाही. याठिकाणी पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास हे पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येईल. -महेंद्र दळवी, ग्रामस्थ, कोकरे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी