शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:48 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़

ठळक मुद्दे१८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा प्राथमिक शाळांमधील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़सभापती नागले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली़ या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले होते़ हे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणारे आहेत़ त्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याबाबत चर्चा झाली़ यामध्ये हे उपक्रम राबविण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला़लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्तरावर खेळाडूंचा संघ निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे हरलेल्या संघातील चांगल्या खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये केंद्र, बीट, तालुकास्तर, जिल्हास्तरावर संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हावर निवड करण्यात आलेला संघ राज्यस्तरावर खेळवण्यात येणार आहे, अशा प्रकारे चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय प्रथम घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे़ त्यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १८८ प्राथमिक शाळांची पटसंख्या ० ते १० आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयावर आजच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़नाईलाजास्तव शासन निर्णयाची अंमलबजावणीे जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. त्यामुळे या १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याने या शाळा बंद होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या मागे कमी पटसंख्येचे असलेले शुक्लकाष्ट संपता संपेना; घटत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याची वेळ आली आहे.

समायोजन करताना नजीकच्या शाळेतच करण्यात यावे, अशी मागणी आता जिल्ह्यातील पालकांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांच्या घटत्या पटसंख्येला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा