शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:48 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़

ठळक मुद्दे१८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा प्राथमिक शाळांमधील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़सभापती नागले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली़ या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले होते़ हे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणारे आहेत़ त्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याबाबत चर्चा झाली़ यामध्ये हे उपक्रम राबविण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला़लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्तरावर खेळाडूंचा संघ निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे हरलेल्या संघातील चांगल्या खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये केंद्र, बीट, तालुकास्तर, जिल्हास्तरावर संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हावर निवड करण्यात आलेला संघ राज्यस्तरावर खेळवण्यात येणार आहे, अशा प्रकारे चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय प्रथम घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे़ त्यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १८८ प्राथमिक शाळांची पटसंख्या ० ते १० आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयावर आजच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़नाईलाजास्तव शासन निर्णयाची अंमलबजावणीे जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. त्यामुळे या १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याने या शाळा बंद होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या मागे कमी पटसंख्येचे असलेले शुक्लकाष्ट संपता संपेना; घटत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याची वेळ आली आहे.

समायोजन करताना नजीकच्या शाळेतच करण्यात यावे, अशी मागणी आता जिल्ह्यातील पालकांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांच्या घटत्या पटसंख्येला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा