शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येमुळे रत्नागिरीतील १८८ शाळांना लागणार कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:48 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़

ठळक मुद्दे१८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा प्राथमिक शाळांमधील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ० ते १० पटसंख्येच्या १८८ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करावे, असा आदेश शासनाने दिला आहे. या विषयावर झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़सभापती नागले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली़ या सभेत जिल्ह्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले होते़ हे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणारे आहेत़ त्यासाठी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी राबविलेले उपक्रम जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याबाबत चर्चा झाली़ यामध्ये हे उपक्रम राबविण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला़लवकरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्तरावर खेळाडूंचा संघ निवड करण्यात येणार आहे़ त्यामुळे हरलेल्या संघातील चांगल्या खेळाडूंना यामध्ये संधी देण्यात येणार आहे.

यामध्ये केंद्र, बीट, तालुकास्तर, जिल्हास्तरावर संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हावर निवड करण्यात आलेला संघ राज्यस्तरावर खेळवण्यात येणार आहे, अशा प्रकारे चांगल्या खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय प्रथम घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला़ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात घट होत आहे़ त्यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १८८ प्राथमिक शाळांची पटसंख्या ० ते १० आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयावर आजच्या शिक्षण समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली़नाईलाजास्तव शासन निर्णयाची अंमलबजावणीे जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे. त्यामुळे या १८८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार असल्याने या शाळा बंद होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या मागे कमी पटसंख्येचे असलेले शुक्लकाष्ट संपता संपेना; घटत्या पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याची वेळ आली आहे.

समायोजन करताना नजीकच्या शाळेतच करण्यात यावे, अशी मागणी आता जिल्ह्यातील पालकांकडून होत आहे. मात्र, दुसरीकडे शाळांच्या घटत्या पटसंख्येला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा