शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:16 IST

या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

राजापूर : धोपेश्वर - बारसूमध्ये येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या विविध चाचण्या सुरू असतानाच या प्रकल्पाकरिता चिपळूण येथील कोयना अजवल राजापुरात आणावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या तसेच व्यवसाय याव्यतिरिक्तदेखील या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

रिफायनरी प्रकल्पाकरिता वार्षिक सुमारे २ ते २.५ टीएमसी इतक्या मोठ्या स्वरूपाच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत राजापूर तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र ६७.५ टीएमसी पाणी कोयना धरणाच्या कोळकेवाडी जलाशयातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा विनियोग या प्रकल्पासाठी होऊ शकतो. याकरिता सुमारे १२० किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

चिपळूण ते राजापूर दरम्यान चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, पाचल यासारखी दाट लोकसंख्या असलेली शहरे व गावे आहेत. त्यांना याच पाईपलाईनआधारे पाणीपुरवठा होऊ शकतो. वाया जाणारे हे पाणी दक्षिणेकडे वळविल्यास दुबार पीक योजनाही राबवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राजापुरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रील गाळ उपसण्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाद्वारे तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकते. राजापूर शहरातील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामार्फत अर्जुना व कोदवली नदीतील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा करण्याची मागणीही साळवी यांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कापल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात किमान रत्नागिरी जिल्ह्यातील महामामार्गावर कमीत कमी एक लाख झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची योजना या प्रकल्पाकडे प्रस्तावित करीत आहे. वृक्षारोपण आणि पाच वर्षे त्याची देखभाल ही जबाबदारी कंपनीकडे सोपवावी, अशी मागणीही आमदार साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरnanar refinery projectनाणार प्रकल्पRajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरे