शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:16 IST

या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

राजापूर : धोपेश्वर - बारसूमध्ये येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या विविध चाचण्या सुरू असतानाच या प्रकल्पाकरिता चिपळूण येथील कोयना अजवल राजापुरात आणावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या तसेच व्यवसाय याव्यतिरिक्तदेखील या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

रिफायनरी प्रकल्पाकरिता वार्षिक सुमारे २ ते २.५ टीएमसी इतक्या मोठ्या स्वरूपाच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत राजापूर तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र ६७.५ टीएमसी पाणी कोयना धरणाच्या कोळकेवाडी जलाशयातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा विनियोग या प्रकल्पासाठी होऊ शकतो. याकरिता सुमारे १२० किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

चिपळूण ते राजापूर दरम्यान चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, पाचल यासारखी दाट लोकसंख्या असलेली शहरे व गावे आहेत. त्यांना याच पाईपलाईनआधारे पाणीपुरवठा होऊ शकतो. वाया जाणारे हे पाणी दक्षिणेकडे वळविल्यास दुबार पीक योजनाही राबवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राजापुरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रील गाळ उपसण्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाद्वारे तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकते. राजापूर शहरातील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामार्फत अर्जुना व कोदवली नदीतील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा करण्याची मागणीही साळवी यांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कापल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात किमान रत्नागिरी जिल्ह्यातील महामामार्गावर कमीत कमी एक लाख झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची योजना या प्रकल्पाकडे प्रस्तावित करीत आहे. वृक्षारोपण आणि पाच वर्षे त्याची देखभाल ही जबाबदारी कंपनीकडे सोपवावी, अशी मागणीही आमदार साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरnanar refinery projectनाणार प्रकल्पRajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरे