शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:16 IST

या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

राजापूर : धोपेश्वर - बारसूमध्ये येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या विविध चाचण्या सुरू असतानाच या प्रकल्पाकरिता चिपळूण येथील कोयना अजवल राजापुरात आणावे, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या तसेच व्यवसाय याव्यतिरिक्तदेखील या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

रिफायनरी प्रकल्पाकरिता वार्षिक सुमारे २ ते २.५ टीएमसी इतक्या मोठ्या स्वरूपाच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत राजापूर तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र ६७.५ टीएमसी पाणी कोयना धरणाच्या कोळकेवाडी जलाशयातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा विनियोग या प्रकल्पासाठी होऊ शकतो. याकरिता सुमारे १२० किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

चिपळूण ते राजापूर दरम्यान चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, पाचल यासारखी दाट लोकसंख्या असलेली शहरे व गावे आहेत. त्यांना याच पाईपलाईनआधारे पाणीपुरवठा होऊ शकतो. वाया जाणारे हे पाणी दक्षिणेकडे वळविल्यास दुबार पीक योजनाही राबवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

राजापुरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रील गाळ उपसण्यासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाद्वारे तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकते. राजापूर शहरातील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामार्फत अर्जुना व कोदवली नदीतील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा करण्याची मागणीही साळवी यांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कापल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात किमान रत्नागिरी जिल्ह्यातील महामामार्गावर कमीत कमी एक लाख झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची योजना या प्रकल्पाकडे प्रस्तावित करीत आहे. वृक्षारोपण आणि पाच वर्षे त्याची देखभाल ही जबाबदारी कंपनीकडे सोपवावी, अशी मागणीही आमदार साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरnanar refinery projectनाणार प्रकल्पRajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरे