शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

रत्नागिरीला वापरून मगच मराठवाड्याला कोयना धरणाचे पाणी, पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:42 IST

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले ...

रत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कसा करावा, याबाबत पेंडसे समितीने दिलेल्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मगच पाणी मराठवाड्याला दिले जाईल, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली.रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. समुद्राला जाऊन मिळणारे कोयना अवजल मराठवाड्याकडे नेण्याचा विषय काही काही काळाने चर्चेत येतो. जवळपास गेली २०-२५ वर्षे कोयना अवजलावर चर्चा होत आहे. कोयनामध्ये दरवर्षी १,९११ दशलक्ष घनमीटर इतके पाणी वीजनिर्मिती केल्यानंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. वाशिष्ठी नदीतून हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी मराठवाड्याला, मुंबईला देण्यावर तसेच ते जिल्ह्यासाठी वापरण्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, अजूनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

या विषयावर मंत्री सामंत म्हणाले की, १९९९ पासून कोयना अवजलाबाबत आपण अभ्यास करीत आहोत. आमदार झाल्यानंतर २००५ मध्ये याबाबत विधान परिषदेत पिटीशन दाखल केले होते. त्याला अनुसरून पेंडसे समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशींचा तंतोतंत वापर करून कोयना अवजल प्रथम रत्नागिरी जिल्ह्यासाठी वापरले जाईल आणि त्यानंतर ते मराठवाड्याला दिले जाईल.

काय होता अहवाल?-२७ सप्टेंबर २००६ रोजी या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला.-वीजनिर्मितीनंतर कसलाही उपयोग न होता समुद्राला जाऊन मिळणारे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिल्यास ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.-या पाण्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल आणि त्यातून स्वयंरोजगारही उपलब्ध होईल.-या पाण्यावर केवळ शेतीच नाही. तर लघू विद्युतनिर्मिती प्रकल्प, दूध डेअरी, फळ बागायत यालाही चालना मिळेल, असे या अहवालातून मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKoyana Damकोयना धरणWaterपाणीUday Samantउदय सामंत