शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

कोसबी सरपंचांना कोकण आयुक्तांकडून दिलासा, विष्णू वाडेकर यांची निवड अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:45 IST

चिपळूण तालुक्यातील कोसबी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सावंत यांना कोकण आयुक्तांनी दिलासा दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर कायम राहण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले असून, विद्यमान सरपंच विष्णू बारकू वाडेकर यांची निवड अवैध ठरवली आहे.

ठळक मुद्देकोसबी सरपंचांना कोकण आयुक्तांकडून दिलासा, विष्णू वाडेकर यांची निवड अवैध मीनाक्षी सावंत यांना सरपंचपदावर राहण्याची संधी

चिपळूण : तालुक्यातील कोसबी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी सावंत यांना कोकण आयुक्तांनी दिलासा दिला आहे. त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर कायम राहण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले असून, विद्यमान सरपंच विष्णू बारकू वाडेकर यांची निवड अवैध ठरवली आहे.कोसबी ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच विष्णू वाडेकर यांनी निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर केला नाही म्हणून जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी त्यांना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी अपात्र ठरवले होते. त्यामुळे सरपंचपद रिक्त झाले आणि जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तहसीलदार, चिपळूण यांनी कोसबी ग्रामपंचायत सरपंच निवडणूक जाहीर केली. त्या निवडणुकीत मीनाक्षी सावंत या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. सावंत या शिवसेनेच्या कार्यकर्त्या असून, त्यांचे पती मिलिंंद सावंत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.दरम्यान, अपात्र ठरलेले विष्णू वाडेकर यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या निकालाला आव्हान देत कोकण आयुक्तांकडे दाद मागितली होती. कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश रद्द करत वाडेकर यांच्या बाजूने निकाल दिला व वाडेकर यांचे सदस्यपद आणि सरपंचपददेखील कायम ठेवले.

कोकण आयुक्तांच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी विष्णू वाडेकर यांना पुन्हा सरपंचपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाडेकर यांनी कोसबी ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतला होता आणि विद्यमान सरपंच सावंत यांचा काही दोष नसताना सरपंच पदावरुन पायउतार व्हायला लागले होते.आपल्यावर अन्याय झाला. आपण कायदेशीरपणे निवडणूक लढवून सरपंचपदी निवडून आलो होतो. असे कारण देत सावंत यांनी थेट कोकण आयुक्तांकडे धाव घेऊन दाद मागितली. चिपळूणचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिध्द अ‍ॅड. बकुल भोसले यांनी या प्रकरणात आयुक्तांसमोर युक्तिवाद केला.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सावंत या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांना अशा प्रकारे अवैध ठरवता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत. तसेच तत्कालिन सरपंच वाडेकर यांच्या अपिलावर त्यावेळी स्थगितीदेखील दिलेली नव्हती. तसेच सावंत यांना त्यांची बाजू मांडण्याचीही संधी दिलेली नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.युक्तिवाद ग्राह्ययाकरिता सावंत यांच्यावतीने चिपळूणचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिध्द अ‍ॅड. बकुल भोसले यांनी युक्तिवाद केला होता. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत कोकण आयुक्तांनी हा निकाल दिला आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचRatnagiriरत्नागिरी