शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कोकणची पोरं हुश्शार!, दहावीचा कोकण मंडळाचा ८८.३८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७.६२ टक्केने निकाल घसरला असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

ठळक मुद्देकोकणची पोरं हुश्शार!, दहावीचा कोकण मंडळाचा ८८.३८ टक्के निकाल सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम, निकालाचा टक्का मात्र घसरला

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७.६२ टक्केने निकाल घसरला असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ७०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १७ हजार ८०३ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार २१६ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.४७ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९.८६ टक्केने प्रमाण घटले आहे.

मंडळातून १६ हजार ७९९ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १५ हजार ३६५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४६ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ०.०१ ने वाढले आहे.मुलींचे प्रमाण जास्त संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५.२६ ने घटले आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.९९ टक्के अधिक आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेस बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ११ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ११ हजार २८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. १० हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९१.२४ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा ४.३४ टक्के इतका अधिक आहे.निकालाचा टक्का घसरलाकोकण विभागाने दहावीच्या निकालात बोर्डात उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असली तरी यावर्षी एकूण निकालाचा टक्का मात्र घसरला आहे. २०१२ मध्ये ९३.९४ टक्के, २०१३ मध्ये ९३.७९ टक्के, २०१४ मध्ये ९५.५७ टक्के, तर २०१५ मध्ये ९६.५४ टक्के, २०१६ मध्ये ९६.५६ टक्के, २०१७ मध्ये ९६.१८, २०१८ मध्ये ९६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ७.६२ टक्केने निकाल कमी असला तरी राज्यात सर्वोत्कृष्ट निकाल आहे. गेल्या आठ वर्षात २०१६ साली सर्वोच्च निकाल राहिला होता. कोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा असून ११४ परीक्षा केंद्र आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा आहेत. पैकी ९६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. २२० शाळांचा निकाल ९०.०१ ते ९९.९९ टक्के, २२३ शाळांचा निकाल ८०.०१ ते ९० टक्के, ६४ शाळांचा निकाल ७०.०१ ते ८० टक्के तर १९ शाळांचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे. सहा शाळांचा निकाल ५०.०१ ते ६० टक्के, एकमेव शाळा ४०.०१ ते ५० टक्के तर दोन शाळांचा निकाल ३०.०१ ते ४० टक्के इतका निकाल लागला आहे.विशेष गुणवत्तारत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे. ११ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणी, तर २ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळविली आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी