शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोकणची पोरं हुश्शार!, दहावीचा कोकण मंडळाचा ८८.३८ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७.६२ टक्केने निकाल घसरला असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

ठळक मुद्देकोकणची पोरं हुश्शार!, दहावीचा कोकण मंडळाचा ८८.३८ टक्के निकाल सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम, निकालाचा टक्का मात्र घसरला

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल जाहीर झाला असून कोकण मंडळाचा एकूण निकाल ८८.३८ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळविले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७.६२ टक्केने निकाल घसरला असल्याची माहिती मंडळाच्या विभागिय सचिव भावना राजनोर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ७०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १७ हजार ८०३ मुलगे परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार २१६ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.४७ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९.८६ टक्केने प्रमाण घटले आहे.

मंडळातून १६ हजार ७९९ मुली परीक्षेस बसल्या होत्या. पैकी १५ हजार ३६५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४६ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ०.०१ ने वाढले आहे.मुलींचे प्रमाण जास्त संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५.२६ ने घटले आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.९९ टक्के अधिक आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेस बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ११ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती पैकी ११ हजार २८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. १० हजार २९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९१.२४ टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सिंधुदूर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदूर्ग जिल्ह्याचा ४.३४ टक्के इतका अधिक आहे.निकालाचा टक्का घसरलाकोकण विभागाने दहावीच्या निकालात बोर्डात उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असली तरी यावर्षी एकूण निकालाचा टक्का मात्र घसरला आहे. २०१२ मध्ये ९३.९४ टक्के, २०१३ मध्ये ९३.७९ टक्के, २०१४ मध्ये ९५.५७ टक्के, तर २०१५ मध्ये ९६.५४ टक्के, २०१६ मध्ये ९६.५६ टक्के, २०१७ मध्ये ९६.१८, २०१८ मध्ये ९६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ७.६२ टक्केने निकाल कमी असला तरी राज्यात सर्वोत्कृष्ट निकाल आहे. गेल्या आठ वर्षात २०१६ साली सर्वोच्च निकाल राहिला होता. कोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा असून ११४ परीक्षा केंद्र आहेत.१०० टक्के निकालकोकण विभागात ६३१ माध्यमिक शाळा आहेत. पैकी ९६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. २२० शाळांचा निकाल ९०.०१ ते ९९.९९ टक्के, २२३ शाळांचा निकाल ८०.०१ ते ९० टक्के, ६४ शाळांचा निकाल ७०.०१ ते ८० टक्के तर १९ शाळांचा निकाल ६० ते ७० टक्के इतका लागला आहे. सहा शाळांचा निकाल ५०.०१ ते ६० टक्के, एकमेव शाळा ४०.०१ ते ५० टक्के तर दोन शाळांचा निकाल ३०.०१ ते ४० टक्के इतका निकाल लागला आहे.विशेष गुणवत्तारत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून ३४ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ३० हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे. ११ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणी, तर २ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळविली आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी