शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे : रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:29 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे : रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरूवातउन्हाळी हंगामासाठी रेल्वेच्या जादा ५२ फेऱ्या

रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा येत्या २२ मार्चला संपणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा ओढा आता कोकणातील त्यांच्या गावाकडे आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामाकरिता मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने ५२ जादा रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांच्या आरक्षणाला १६ मार्चपासून सुरूवातही झाली आहे.गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवन वाहिनी बनली आहे. सण असो वा उन्हाळी हंगाम असो या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी कोकण रेल्वे नेहमीच सज्ज असते. 

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी हंगामात कोकणवासीयांना प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष गाड्यांचे हे नियोजन आहे. त्याअंतर्गत क्रमांक ०१०५१चे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक रेल्वे गाडीच्या ८ विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.

१७ मे २०१९ ते ७ जून २०१९ या काळात ही गाडी मार्गावरून धावणार आहे. दर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता ०१०५१ नंबरची रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहे तर करमाळी येथून परतीची ०१०५२ क्रमांकाची रेल्वे १९ मे ते २० जून दरम्यान दर रविवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक रेल्वे क्रमांक ०१०४५/०१०४६च्या १८ फेऱ्या १२ एप्रिल ते ७ जून दरम्यान होणार आहेत. यातील ०१०४५ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२ एप्रिल २०१९पासून दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार आहे. तर परतीची ०१०४६ ही गाडी करमाळी येथून १८ मे ते ८ जून या काळात दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी व करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक क्रमांक ०१०१५/०१०१६ या फेºया १८ मे ते १९ जून या काळात मार्गावर धावणार आहेत.लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड व सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे क्रमांक ०१०३७/०१०३८च्या फेऱ्या कोकण रेल्वे मार्गावर ८ एप्रिल ते ६ जून २०१९ या काळात होणार आहेत. कोकणात येणाऱ्यांची संख्या मार्च महिन्याच्या अखेरीपासून वाढणार असल्याने कोकण रेल्वेने हे नियोजन केले आहे.दरम्यान, १२०५१/१२०५२ दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेसला पावसाळ्यात १० जून ते ३१ आॅक्टोबर या काळात विस्टा डोम कोच जोडल्या जाणार आहेत.कोकणात गणेशोत्सवासाठीही येणाऱ्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांना रेल्वे आरक्षणाची सोय चार महिने आधी उपलब्ध करून दिली जाते. यावेळी एप्रिलच्या उत्तरार्धात गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यासाठीही कोकण रेल्वेकडून आतापासूनच सज्जता ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी