शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता कोकणातले तीळ खा; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले ‘कारळा’ तिळाचे नवे वाण

By मेहरून नाकाडे | Updated: January 1, 2024 14:19 IST

कमी श्रम, कमी दिवस

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : काळाच्या ओघात तिळाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. त्यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने ‘कारळा’ तिळावर संशोधन करून नवीन वाण विकसित केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे तिळावरील पहिलेच संशोधन असून, विद्यापीठाने तयार केलेले हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देणारे आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात भात मुख्य तर नागली/नाचणीचे दुय्यम पीक घेतले जाते. पडीक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र अवघे ०.२० हेक्टर इतकेच होते. पारंपरिक वाणामुळे उत्पादकता कमी असल्याने २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात यावर संशोधन सुरू होते. नाशिक, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले. संशोधन पूर्ण होऊन ‘कारळा’चे नवीन वाण विकसित करण्यास यश आले आहे.कमी पाण्यात, कमी दिवसात हे पीक तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वाणाची चाचणी सुरू आहे. गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. शेतकऱ्यांकडून उत्पादकतेची तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसात ‘कारळा’ नवीन वाणाचे नामकरण होऊन येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना ‘कारळा’ नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आंबा, काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून ‘कारळा’ तिळाचे घेता येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाळी तिळाच्या शेतीतून उत्पन्न मिळू शकणार आहे. काळ्या तिळामध्ये कॅल्शिअम, फायबर, लोह, फाॅस्फरससारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी पोषक असतात. आहारात काळ्या तिळाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते. केस व त्वचेलाही फायदा होतो. त्यामुळे आहारात तीळ, तिळाचे तेल याचाही वापर केला जातो. तिळात तेलाचे प्रमाण कितपत आहे, यावर पिकाची गुणवत्ता ठरते. संशोधन केंद्रात संशोधित केलेले पीक नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे

आंतरपिकातून उत्पन्न

पारंपरिक तिळाची उत्पादकता कमी असल्याने हे पीक दुर्लक्षित झाले, त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून तिळाची आवक होत असे. शेतकऱ्यांकडूनही तिळाच्या वाणासाठी मागणी सुरू होती. विद्यापीठाचे संशोधन पूर्ण होऊन नवे वाण विकसित करण्यास यश आले आहे. ऑगस्टच्या शेवटी लागवड केली तरी तीन महिन्यात पीक तयार होते.कमी श्रम, कमी दिवसविद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकासाठी श्रम, वेळ व पैसा कमी लागतो. तिळातील तेलाचे प्रमाण ४२ टक्के आहे. ३५ ते ४० दिवसात फुलोरा येऊन ९० दिवसात पीक तयार होते. हेक्टरी उत्पादकता ४५० ते ५०० किलो आहे. वन्य प्राण्याचा त्रास नाही. विद्यापीठाची शिफारस असल्याने शासकीय अनुदान उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणuniversityविद्यापीठ