शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा
4
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
5
गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश
6
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
7
इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...
8
Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंब्रा- कळवा मार्गावर लोकलची बैलाला धडक
9
अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
10
पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये
11
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
12
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
13
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
14
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
15
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
16
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
17
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
18
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
19
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
20
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story

मुंबईकर अजून चिंतेतच; असे कोण म्हणाले- सुखरुप आणणार म्हणतात, पण अद्याप निर्णय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 13:12 IST

रत्नागिरी : शासनाने मुंबई , पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय ...

ठळक मुद्देमुंबईवरून येणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार

रत्नागिरी : शासनाने मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय घेईल, त्यावेळी जिल्हा प्रशासन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणेल. सध्या त्यांच्याबद्दल कुठलाही निर्णय झाला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.सामंत म्हणाले की, शासनाने ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी काही गोष्टींबाबत शिथिलता दिली आहे. मात्र, त्यासाठी जी नियमावली जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आली, ती नियमावली योग्यप्रकारे न वाचल्याने आज दुकाने उघडल्यानंतर गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कोणती दुकाने कशाप्रकारे सुरू ठेवायची, याबाबत व्यापारी संघटनांशी तसेच संबंधित घटकांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगिलते की, मुंबई व पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने तिथल्या लोकांना रत्नागिरीत आणण्याचा सध्या कुठलाही विचार नाही. मात्र, जे मजूर किंवा व्यक्ती परराज्यातील आहेत, त्यांना पाठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच जे जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, त्यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लिंक देण्यात आली आहे.गेल्या दोन दिवसात कोरोनाचे चार रूग्ण वाढले आहेत. हे रूग्ण मुंबईहून आले असल्याने आता मुंबईतून येणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. मुंबईतून येणाऱ्यांची मुख्य मार्गावर काटेकोर तपासणी करण्यात येत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. तसा शासन निर्णय झाला तर येणाऱ्या व्यक्ती कुठल्या भागातून येणार आहेत, त्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवायचे की घरीच त्यांचे विलगीकरण करायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मिश्रा म्हणाले. रिक्षा बंदीबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.अर्जांचा खचप्रशासनाने दिलेल्या लिंकद्वारे जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १६ हजार ३०० लोकांनी अर्ज केले आहेत. रत्नागिरीत येण्यासाठी २२ हजार २०० व्यक्तिंनी लिंकद्वारे अर्ज केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणUday Samantउदय सामंतMumbaiमुंबई