शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर अजून चिंतेतच; असे कोण म्हणाले- सुखरुप आणणार म्हणतात, पण अद्याप निर्णय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 13:12 IST

रत्नागिरी : शासनाने मुंबई , पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय ...

ठळक मुद्देमुंबईवरून येणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार

रत्नागिरी : शासनाने मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. ज्यावेळी शासन हा निर्णय घेईल, त्यावेळी जिल्हा प्रशासन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी आणेल. सध्या त्यांच्याबद्दल कुठलाही निर्णय झाला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.सामंत म्हणाले की, शासनाने ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी काही गोष्टींबाबत शिथिलता दिली आहे. मात्र, त्यासाठी जी नियमावली जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आली, ती नियमावली योग्यप्रकारे न वाचल्याने आज दुकाने उघडल्यानंतर गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कोणती दुकाने कशाप्रकारे सुरू ठेवायची, याबाबत व्यापारी संघटनांशी तसेच संबंधित घटकांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगिलते की, मुंबई व पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने तिथल्या लोकांना रत्नागिरीत आणण्याचा सध्या कुठलाही विचार नाही. मात्र, जे मजूर किंवा व्यक्ती परराज्यातील आहेत, त्यांना पाठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच जे जिल्ह्याबाहेर अडकलेले आहेत, त्यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लिंक देण्यात आली आहे.गेल्या दोन दिवसात कोरोनाचे चार रूग्ण वाढले आहेत. हे रूग्ण मुंबईहून आले असल्याने आता मुंबईतून येणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. मुंबईतून येणाऱ्यांची मुख्य मार्गावर काटेकोर तपासणी करण्यात येत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. तसा शासन निर्णय झाला तर येणाऱ्या व्यक्ती कुठल्या भागातून येणार आहेत, त्यावर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवायचे की घरीच त्यांचे विलगीकरण करायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मिश्रा म्हणाले. रिक्षा बंदीबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.अर्जांचा खचप्रशासनाने दिलेल्या लिंकद्वारे जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १६ हजार ३०० लोकांनी अर्ज केले आहेत. रत्नागिरीत येण्यासाठी २२ हजार २०० व्यक्तिंनी लिंकद्वारे अर्ज केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणUday Samantउदय सामंतMumbaiमुंबई