शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Ratnagiri News: कोदवली धरण भरले, राजापूरकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन मिटले

By अरुण आडिवरेकर | Updated: June 27, 2023 18:40 IST

विनोद पवार राजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात झालेला खडखडाट, त्यातच लांबलेला पाऊस यामुळे गेले दोन ते ...

विनोद पवारराजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात झालेला खडखडाट, त्यातच लांबलेला पाऊस यामुळे गेले दोन ते अडीच महिने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या. पावसामुळे कोदवली धरण तुडुंब भरल्याने आता शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत पूर्ववत नियमीत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.मार्च महिन्यात कोदवली धरणात खडखडाट झाला हाेता. केवळ शीळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरठा अवलंबून होता. मात्र, शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रारंभी एक दिवसाआड तर त्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाऊस लांबल्याने आणखीच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या. शहरातील अनेक भागात तीन ते चार दिवसआड पाणीपुरवठा सुरू होता.या काळात राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी शहरातील नागरिकांना टँकरने पाणीपुरठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच नगर परिषद प्रशासनाकडूनही मुख्याधिकारी प्रशांत भोसले व कर्मचाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा शहरात पुरविण्यासाठी प्रयत्न केले.अखेर मान्सून सक्रिय झाला असून, कोदवली धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्णपणे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या साठवण टाकीत मुबलक पाणीसाठा झाला आहे. मुबलक पाणीसाठा झाल्याने शहरातील सर्व भागात पूर्ववत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीDamधरण