शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:13 IST

शिवाजी गोरे दापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण ...

शिवाजी गोरेदापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण कर, अशी प्रार्थना करीत हजारो मच्छीमारांनी समुद्राला नारळ अर्पण केला. दोन वर्षे कोरोना आणि वादळी वाऱ्यामुळे मेटाकुटीला आलेल्या मच्छिमारांनी येणारा हंगाम तरी सुखाचा राहू दे, असे साकडेही दर्या सागराला घातले.

कोळी बांधवांचा सण अशी ओळख असलेली नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे गेले दोन वर्षे नारळी पौर्णिमेचा उत्सव अगदी थोडक्या लोकांमध्येच केवळ उपचार म्हणून साजरा करण्यात आला होता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने कोळी बांधवांनी सर्व पारंपरिक पद्धतींचा अवलंब करीत हा सण साजरा केला. आबालवृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी गीतावर ठेका धरत, शोभायात्रा काढली.

नारळी पौर्णिमेचे यजमान मंडळी म्हणून गोरेवाले मंडळ, तसेच शेतवाडी तुरेवाले, रस्तावाले, जुनी कुलाबकर, नवीन कुलाबकर, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ, श्रीराम हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा व सर्व पाजपंढरी ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. खंडेरायाच्या वेशभूषेतील तरुण, भारत माता साकारलेली चिमुरडी हे या शोभायात्रेचे खास आकर्षण झाले होते.

मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्टपासून उठविली जात असली, तरी अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच समुद्रात होडी लोटतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार