शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:13 IST

शिवाजी गोरे दापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण ...

शिवाजी गोरेदापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण कर, अशी प्रार्थना करीत हजारो मच्छीमारांनी समुद्राला नारळ अर्पण केला. दोन वर्षे कोरोना आणि वादळी वाऱ्यामुळे मेटाकुटीला आलेल्या मच्छिमारांनी येणारा हंगाम तरी सुखाचा राहू दे, असे साकडेही दर्या सागराला घातले.

कोळी बांधवांचा सण अशी ओळख असलेली नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे गेले दोन वर्षे नारळी पौर्णिमेचा उत्सव अगदी थोडक्या लोकांमध्येच केवळ उपचार म्हणून साजरा करण्यात आला होता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने कोळी बांधवांनी सर्व पारंपरिक पद्धतींचा अवलंब करीत हा सण साजरा केला. आबालवृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी गीतावर ठेका धरत, शोभायात्रा काढली.

नारळी पौर्णिमेचे यजमान मंडळी म्हणून गोरेवाले मंडळ, तसेच शेतवाडी तुरेवाले, रस्तावाले, जुनी कुलाबकर, नवीन कुलाबकर, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ, श्रीराम हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा व सर्व पाजपंढरी ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. खंडेरायाच्या वेशभूषेतील तरुण, भारत माता साकारलेली चिमुरडी हे या शोभायात्रेचे खास आकर्षण झाले होते.

मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्टपासून उठविली जात असली, तरी अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच समुद्रात होडी लोटतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार