शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

किरण सामंत यांचा रोख कोणावर?, स्टेटसवर ठेवलेल्या 'मशाल' चिन्हामुळे राजकीय चर्चेंना उधाण

By मनोज मुळ्ये | Updated: September 29, 2023 17:37 IST

‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही

रत्नागिरी : प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटस्ॲप डीपीला (डिस्प्ले पिक्चर) मशालीचे चित्र ठेवल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी संभाव्य नाव म्हणून चर्चेत असलेल्या किरण सामंत यांचा रोख आमदार नितेश राणे यांच्यावर असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यांचा रोख ‘नेहमी खरं बोलतो’ असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यावर असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे.रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव पुढे येत आहे. आमदार नितेश राणे यांनी वेगळी भूमिका मांडली. हा मतदार संघ भाजपचा आहे आणि जर किरण सामंत यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजपमध्ये यावे लागेल, असे आमदार राणे म्हणाले.या एकूणच राजकीय पार्श्वभूमीवर शुक्रवारी उद्योजक किरण सामंत यांचे व्हॉटस्ॲप डीपी चर्चेचे झाले. त्यांनी आपल्या डीपीला मशालीचे चित्र ठेवले. ‘जो होगा वो देखा जाएगा’ अशी टॅगलाईनही होती. त्यामुळे लगेचच त्यावर चर्चा सुरू झाली. काही वेळातच त्यांनी डीपी बदलले. अलिकडेच नितेश राणे यांनी लोकसभा उमेदवारीवरुन जे विधान केले, त्याला उद्देशून त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ज्यावेळी किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा रोख कोकणावर नसून, पुणेकरांवर असल्याचे स्पष्ट झाले.जे कोण स्पष्ट बोलण्याचा, खरं बोलण्याचा आव आणतात, जे स्वत:चं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचे वाकून पाहतात, त्यांच्या नोबॉलवर फ्री हीट देणार, असे किरण सामंत यांनी सांगितले. खरं बोलणारे पुणेकर नेते त्यांच्या ‘टार्गेट’वर असल्याचे स्पष्ट होत आहे. खरं बोलणारे नेते सध्या सर्वच विभागात अधिक लक्ष देत असल्याने हा रोख त्यांच्यावरच असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत