शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

यंदाही खेड तालुक्यातच खवटी-धनगरवाडीत धावला पाण्याचा पहिला टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:00 IST

water shortage Chiplun Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.

ठळक मुद्देपाऊस आणि बंधाऱ्याच्या कामांमुळे १८ दिवस उशिराने टँकरची गरजटँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत होत आहे वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टँकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर खेड तालुक्यातच धावला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते. येथील लोकांना तर सोडाच, जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. तसेच यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत उशिरा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़.गतवर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे गावठाण नवीन वसाहतीमध्ये दि. १२ फेबुवारी २०२० रोजी पहिला टँकर धावला होता. यंदा खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी खालची धनगरवाडी हे खेड तालुक्याचे शेवटचे टोक असून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्याला लागूनच हे गाव डोंगरात वसलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. उशिरापर्यंत पडलेला पाऊस आणि बंधारे यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा १८ दिवस उशिरा खवटी खालची धनगरवाडी येथे पहिला टँकर प्रशासनाकडून धावला.१६ कोटींचा आराखडाटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांतील १५३ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाने जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.दूषित पाण्याचा त्रासरत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरी दूषित पाण्यामुळे दूषित झाल्या होत्या. या दूषित पाण्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून शिरगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी