शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

घरात वीज येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते, रत्नागिरीतील कामथे धनगरवाडीतील खरात यांचे उद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:28 IST

यशवंत खरात हे ५ वर्षांपूर्वी दहीवली गावातील मूकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच त्यांचे उदरनिर्वाहचे साधन. मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या. अशातच खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. अन्...

मनीष दळवीअसुर्डे : एका कुटुंबासाठी १०-१५ वीजखांब टाकून जंगलातून वीज घ्यायची म्हटले तर गरिबाने एवढा पैसा कुठून आणावा? त्यामुळे आपण असेपर्यंत वीज मिळणे हे माझे दिवा स्वप्न होते. माझ्या डोंगरदऱ्यातील घरात वीज येऊन घर उजळेल, हे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते, हे उद्गार आहेत चिपळूण तालुक्यातील कामथे धनगरवाडीतील रहिवासी यशवंत बाबाजी खरात यांचे.यशवंत खरात हे ५ वर्षांपूर्वी दहीवली गावातील मूकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच त्यांचे उदरनिर्वाहचे साधन. गेली पाच वर्षे मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या. रस्ता, वीज, पाणी यापासून वंचित असलेले हे कुटुंब वीज पुरवठा घेण्यासाठी जवळपास १ किलाेमीटरपर्यंत वाहिनी नाही. घरात ८ माणसांचे कुटुंब केवळ दुधाच्या धंद्यावर चालवायचे. अशातच खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला आणि त्यांचे चालणे-फिरणे बंद झाले. त्यांची परिस्थिती जाणून सावर्डे येथे डॉ. अजय पाटील व डॉ. विजय पाटील हे त्यांच्यावर उपचार करण्याकरिता रात्री अपरात्री त्यांच्याकडे जात असत.खरात यांचे घरी वीज नसल्याचे डॉक्टर बंधूंनी महावितरणचे अशोक काजरोळकर यांना सांगितले. त्यांनी खरात यांचा वीज मागणी अर्ज घेऊन महावितरणचे उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर यांनी सावर्डे शाखाधिकारी यांना प्रकरण मंजुरीकरिता पाठविण्यास सांगितले. घाडगे यांनी जंगलातून सर्वेक्षण करून हे प्रकरण मंजुरीकरिता सादर केले. तर कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी त्वरित मंजुरी देऊन ठेकेदाराची नेमणूक केली. जागा मालकांच्या सहकार्याने ठेकेदार प्रतीक कोल्हापुरे यांनी काम पूर्ण केले. त्यानंतर दि. १८ मार्च रोजी कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी खरात यांच्या घरी भेट देऊन वीज पुरवठा सुरू केला.घरात वीज आल्याचे पाहून यशवंत खरात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यांत पाणी आले. त्यांनी उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर, सहायक अभियंता कमलेश घाडगे, उपकार्यकारी अभियंता शरद परीट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे, कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्या कामाचे काैतुक करून आभार मानले.

हे आमचे कर्तव्य असून आपणास यापुढेही अशीच सेवा देण्यात येईल. घर तिथे वीज देण्याचे धोरण कंपनीचे असल्याने विजेविना असणाऱ्या नवीन ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. - कैलास लवेकर कार्यकारी अभियंता, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणelectricityवीजmahavitaranमहावितरण