कळंबणी रूग्णालयाचे शवागारच मृृतावस्थेत...
By Admin | Updated: January 10, 2015 00:15 IST2015-01-09T21:55:16+5:302015-01-10T00:15:18+5:30
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : शासनस्तरावर लक्ष नसल्याने आता जबाबदारी कोण घेणार याकडे नजरा

कळंबणी रूग्णालयाचे शवागारच मृृतावस्थेत...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कळंबणी येथील उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. या रूग्णालयात शवागार यंत्रणा सध्या अस्तित्त्वातच नसल्याने गैरसोय होत आहे. सरकारने पाच वर्षांपूर्वी ८ लाख रूपये खर्च करून या रूग्णालयाला दिलेली शवपेटी गेल्या तीन वर्षांपासून धूळखात पडली आहे. ही शवपेटी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या शवागाराच्या उभारणीसाठी तातडीचे २ लाख रूपये उपलब्ध होत नसल्याने ही यंत्रणा बंद पडली आहे. आरोग्य खात्याच्या ग्रामीण भागातील रूग्णांच्या सोयीसाठी असलेल्या अशा रूग्णालय अवस्थेबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. १९ मार्चला भरणे येथील जगबुडी नदीवरील पुलावरून कोसळलेल्या आराम बस अपघातानंतर या रूग्णालयाच्या असुविधांबाबत मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. यंत्रणा आहे. मात्र, ती ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेत खोलीची उभारणी करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्याने हे कामही अपूर्ण राहिले आहे. हे मशीन उघड्यावर असल्याने या त्याला आता फिकट रंग प्राप्त झाला आहे. मशीनचा रंग उडाल्याने व गंज चढत असल्याने पावसाळ्यात रूग्णालयाच्या समस्यांमध्ये भर पडणार आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकामी लक्ष घालावे. कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींंद्र वायकर यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून रूग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या रूगणालयाला नवी झळाळी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात अनेक सोयी सुविधा नसल्याने रूग्णांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या ठिकाणी पुरविण्यात आलेल्या अनेक सुविधांचा लाभ रूग्णांना अजूनही मिळत नाही. तसेच येथील शवागाराची स्थिती गंभीर बनली आहे. शासनस्तरावर अनेकवेळा प्रयत्न करूनही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.