शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

काजिर्डा-जामदा प्रकल्पाविरोधात काजिर्डावासीय आंदोलन छेडणार, दडपशाहीने काम सुरू केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:17 IST

गेली २५ वर्षे जामदा प्रकल्पाविरोधी लढा प्राणपणाने लढत आहे

पाचल : महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर २०१५ मध्ये काजिर्डा-जामदा प्रकल्पाची घोषणा केली. मात्र, या प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून, हे काम दडपशाहीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात काजिर्डा येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.गेली २५ वर्षे जामदा प्रकल्पाविरोधी लढा प्राणपणाने लढत आहे. प्रकल्पाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रक्रणी न्यायालयात या प्रकल्पाची चौकशी सुरू होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तब्बल आठ ते दहा वर्षे बंद होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम ग्रामस्थांना विश्वासात न घेता दडपशाहीने सुरू करण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत न्यायालयाच्या चौकशीचे काय झाले, काम सुरू करण्याबाबत न्यायालयाचा काय आदेश आहे, याबाबत अधिकारी व ठेकेदार काहीही बोलण्यास तयार नाही. ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा अथवा बैठक न घेता पोलिस फौजफाटा उभा करून ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या  मनमानी कारभाराविरोधात  ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, प्रकल्पस्थळीच लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्याच्या इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ५० टक्के पुनर्वसन झाल्यानंतरच धरणाचे काम सुरू करावयाचे असते. धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थ, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पुनर्वसन कुठे करणार, धरणग्रस्तांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार, पुनर्वसनाचा संपूर्ण आराखडा ग्रामस्थांसमोर मांडावयाचा असतो.

मात्र, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, शासन नियम-निकष बाजूला ठेवून काम सुरू आहे. अधिकाऱ्यांना चर्चेसाठी निवेदन व निमंत्रण देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे काजिर्डा ग्रामस्थांनी धरण प्रकल्प अधिकारी, ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी