शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याचे ‘जवाहर सिंचन’चे पैसे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 17:36 IST

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसंगमेश्वर तालुक्यातील शेतकरी बेजार काम पूर्ण झाले, अनुदान केव्हा मिळणार?

देवरूख , दि. १६ : संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्याना कृषी क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. यातीलच एक जवाहर सिंचन योजना आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याना जवाहर सिंचन विहिरीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी, अशा नोटीसा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग देवरूख यांच्यामार्फत बजावण्यात आल्या. यानुसार संबंधित शेतकऱ्यानी कर्जे काढून तातडीने विहीर बांधून पुर्ण केल्या आहेत.

अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही या योजनेचे पैसे शेतकºयांना मिळालेले नाहीत. हे शेतकरी पैशासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय देवरूख येथे गेले वर्षभर खेपा मारत आहेत. मात्र अधिकाऱ्याकडून केवळ चालढकल केली जात असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

विहिरीच्या बांधकामामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याना त्वरीत पैसे अदा होणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱ्याना अजूनही वारंवार खेटे घालावे लागत असल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkonkanकोकण