शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोळकेवाडी धरणातून २७ गावांना पाणी देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 17:30 IST

कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीकरता वापरल्यानंतर कोळकेवाडी धरणामध्ये सोडण्यात येते.

चिपळूण : पुणे येथील मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीने सर्व्हेक्षण पूर्ण केले असून, चिपळूण व खेड तालुक्यातील २७ गावांना धरणाच्या आऊटलेटमधून ग्रॅव्हीटीने पाणी देणे शक्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे, असे लेखी उत्तर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.

काेळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत साेडण्यात येणाऱ्या आणि वाहून जाऊन समुद्राला मिळणारे पाणी वळविण्याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न मांडला. त्याला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.

कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीकरता वापरल्यानंतर कोळकेवाडी धरणामध्ये सोडण्यात येते. या पाण्याचा वापर पुन्हा वीजनिर्मितीकरिता करण्यात येतो आणि जवळपास ६७.५० अब्ज घनफुट इतके पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात येते. यातील बहुतांश पाणी हे वाहून जाऊन समुद्राला मिळते. वाहून जाणारे हे पाणी परिसरातील कित्येक गावांची तहान भागवू शकते व ही गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होऊ शकता, या दृष्टीकोनातून आमदार भास्कर जाधव हे गेल्या काही वर्षापासून सतत संघर्ष आणि पाठपुरावा करीत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर २८ फेब्रुवारी २०२० रोजी जलसंपदा मंत्री पाटील यांनी विविध विभागातर्फे अभ्यास समिती नेमून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. त्यानुसार पुणे येथील मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीची नेमणूक करण्यात आली.

आमदार जाधव यांनी हिवाळी अधिवेशनातही तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाचा पुन्हा पाठपुरावा केला. त्यावरील लेखी उत्तरात जलसंपदा मंत्री पाटील यांनी मे. माॅडर्न सर्व्हे कन्सलटंसी या कंपनीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ ग्रामपंचायतीमधील २७ गावांना ग्रॅव्हीटीने धरणाच्या आऊटलेटमधून पाणी देणे शक्य आहे. या २७ पैकी १५ गावांतील सर्व वाड्यांना तर १२ गावांतील काही वाड्यांना पाणी देता येऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे.

ही आहेत ती २७ गावे

चिपळूण तालुक्यातील कान्हे, पिंपळी खुर्द, चिंचघरी सती, खेर्डी, कापसाळ, कामथे बु., मिरजोळी, कोंढे, शिरळ, पेढे, वालोपे, कळंबस्ते, खांदाटपाली, पाली, दळवटणे, वालोटी, खडपोली, कालुस्ते, करंजीकर मोहल्ला. खेड तालुक्यातील काडवली, काजवेवाडी, नवीन कोळकेवाडी, आंबडस, चिरणी, लोटे, धामणदेवी, भेलसई.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी