शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा पावसाळ्यापूर्वी अशक्यच!, पाऊस पडताच काम थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:41 IST

सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ७ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गाळ काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाची गती थंडावली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळाचे उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य बनले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. पण, गाळ टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिपळूण शहर पूरमुक्त होण्यासाठी एक पर्याय म्हणून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी चिपळूणवासीयांना तब्बल महिनाभर साखळी उपोषण छेडावे लागले. त्यानंतर चिपळुणात गाळ काढण्याच्या कामाला सारी यंत्रणा लागली होती. सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात डिझेल चोरीचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप काेणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमतरता जाणवली. टिपर चालकांना प्रति महिना सुमारे १४ ते १५ हजार अथवा प्रतिदिन ५०० रुपये वेतन मिळते. हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही. कंत्राटी स्वरूपात चालक घेतले जातात. डिझेल चोरीच्या घटना, त्यातच कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करणे आणि काम नियमित नसल्याने कामात अडथळे आले.येथील गाळ काढण्याचे काम यापुढे पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थात १५ ते २० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तेवढ्या दिवसांकरिता कोणी चालक मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे आहेत. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. मात्र, नाम फाऊंडेशनने शिवनदीतील बहुतांशी गाळ काढण्याचे काम पूर्ण केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे. वाशिष्ठीतील कामासाठी मात्र अजून बराच वेळ जाणार हे स्पष्ट आहे.अंतिम टप्प्यात लगबगअखेरच्या टप्प्यात चोवीस तास काम सुरू ठेवण्याची हमी जलसंपदा विभाग कोकणचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिली होती. सुरुवातीला आणलेली यंत्रणा अन्यत्र हलविण्यात आली. चालक नसल्यानेही काही यंत्रणा पडून आहे. तुर्तास बहादूरशेख नाका गाळ उपाशाचे काम पूर्ण झाले असले तरी पेठमाप व उक्ताडला मोजकीच यंत्रणा कार्यरत आहे.

गाळासाठी जागेचा तुटवडावाशिष्ठी व शिवनदीतील काढलेला गाळ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, पूरबाधित भागात गाळ न टाकण्याची अट घातली. परिणामी याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील शासकीय व सार्वजनिक जागाही गाळाने भरल्या आहेत. शासकीय जागा शोधून तेथे गाळ टाकावा लागतो आहे. सद्यस्थितीत कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत गाळ टाकला जात आहे. मात्र, काही गाळ १० ते १२ किलोमीटर अंतरावर नेऊन टाकावा लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरChiplunचिपळुणriverनदी