शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा पावसाळ्यापूर्वी अशक्यच!, पाऊस पडताच काम थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:41 IST

सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ७ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गाळ काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाची गती थंडावली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळाचे उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य बनले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. पण, गाळ टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिपळूण शहर पूरमुक्त होण्यासाठी एक पर्याय म्हणून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी चिपळूणवासीयांना तब्बल महिनाभर साखळी उपोषण छेडावे लागले. त्यानंतर चिपळुणात गाळ काढण्याच्या कामाला सारी यंत्रणा लागली होती. सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात डिझेल चोरीचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप काेणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमतरता जाणवली. टिपर चालकांना प्रति महिना सुमारे १४ ते १५ हजार अथवा प्रतिदिन ५०० रुपये वेतन मिळते. हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही. कंत्राटी स्वरूपात चालक घेतले जातात. डिझेल चोरीच्या घटना, त्यातच कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करणे आणि काम नियमित नसल्याने कामात अडथळे आले.येथील गाळ काढण्याचे काम यापुढे पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थात १५ ते २० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तेवढ्या दिवसांकरिता कोणी चालक मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे आहेत. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. मात्र, नाम फाऊंडेशनने शिवनदीतील बहुतांशी गाळ काढण्याचे काम पूर्ण केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे. वाशिष्ठीतील कामासाठी मात्र अजून बराच वेळ जाणार हे स्पष्ट आहे.अंतिम टप्प्यात लगबगअखेरच्या टप्प्यात चोवीस तास काम सुरू ठेवण्याची हमी जलसंपदा विभाग कोकणचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिली होती. सुरुवातीला आणलेली यंत्रणा अन्यत्र हलविण्यात आली. चालक नसल्यानेही काही यंत्रणा पडून आहे. तुर्तास बहादूरशेख नाका गाळ उपाशाचे काम पूर्ण झाले असले तरी पेठमाप व उक्ताडला मोजकीच यंत्रणा कार्यरत आहे.

गाळासाठी जागेचा तुटवडावाशिष्ठी व शिवनदीतील काढलेला गाळ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, पूरबाधित भागात गाळ न टाकण्याची अट घातली. परिणामी याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील शासकीय व सार्वजनिक जागाही गाळाने भरल्या आहेत. शासकीय जागा शोधून तेथे गाळ टाकावा लागतो आहे. सद्यस्थितीत कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत गाळ टाकला जात आहे. मात्र, काही गाळ १० ते १२ किलोमीटर अंतरावर नेऊन टाकावा लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरChiplunचिपळुणriverनदी