शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाटबंधारे विभागाकडून राजापूर शहरातील पूररेषेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : राजापूर शहरातील पूररेषेची आखणी यापूर्वी सन २००८ मध्ये झाली असतानाच पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून ...

राजापूर : राजापूर शहरातील पूररेषेची आखणी यापूर्वी सन २००८ मध्ये झाली असतानाच पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून चुकीच्या पद्धतीने तिची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात त्यांनी रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून हरकत घेऊन सुधारित पूररेषा रद्द करण्याची मागणी केली आहे़

राजापूर शहराला दरवर्षी पुराचा मोठा फटका बसतो व त्यामध्ये सर्व व्यवहार ठप्प होतात. यापूर्वी शहराला बसलेल्या प्रत्येक पुराचा फटका लक्षात घेऊन शासनाने सन २००८ मध्ये राजापूर शहर पूररेषेची आखणी केली होती. पाटबंधारे विभागाकडून ती करण्यात आली होती. शिवाय सुधारित शहर विकास आराखड्यात ती दर्शविण्यात आली होती. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर त्या पूररेषेत बदल करून सुधारित पूररेषा प्रसिद्ध केली आहे. सुधारित पूररेषा चुकीच्या रीतीने प्रसिद्ध झाली असून, ज्या परिसराला पुराचा कधीच फटका बसला नव्हता त्या क्षेत्राचा पूररेषेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात सुधारित पूररेषा शहरवासीयांना उपद्रवी ठरणार आहे. शहराची सुधारित पूररेषा बनविताना राजापूर नगर परिषदेसह येथील नागरिकांनाही कुठल्याच प्रकारची कल्पना देण्यात आलेली नाही, असे ॲड. जमीर खलिफे यांनी म्हटले आहे. सुधारित पूररेषेमुळे नागरिकांना नाहक उपद्रव होणार असून, ती तत्काळ रद्द करण्यात यावी. तसेच यापुढे नवीन सर्वेक्षणाचे काम करताना नगर परिषद व नागरिक यांना कल्पना दिली जावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.