शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: August 30, 2024 15:42 IST

'फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांना केंद्र सरकारने चपराक दिली'

रत्नागिरी : महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत गेली दोन वर्षे अविश्वासाचे वातावरण तयार केले गेले. मात्र महाराष्ट्रातून कोणतेच प्रकल्प गेले नाहीत. उलट दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि तीन वर्षांनी राज्य सलग दोन वर्षे उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या आसपास पाच हजार कोटी रुपये खर्च करुन औद्योगिक शहर वसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मंत्री सामंत यांनी कोकणाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या औद्योगिक शहरात प्राथमिक गुंतवणूक ३८ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातून १ लाख १४ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तेथील प्रकल्प सुरू होईपर्यंत हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगारही उपलब्ध होणार आहे.केंद्र सरकार उद्योग विभागामार्फत राज्याला काही देत नाही, असा फेक नरेटिव्ह विरोधक पसरवतात. मात्र त्याला केंद्र सरकारने चपराक दिली आहे, असे ते म्हणाले. दिघी येथून आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेसह सागरी वाहतूकही जवळ आहे. त्यामुळे कोकणाची आर्थिक उन्नत्ती होईल, असेही त्यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असेल. त्यामुळे याचा परिणाम देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल. गुंतवणूक वाढेल आणि त्यातून कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत