शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: August 30, 2024 15:42 IST

'फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांना केंद्र सरकारने चपराक दिली'

रत्नागिरी : महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत गेली दोन वर्षे अविश्वासाचे वातावरण तयार केले गेले. मात्र महाराष्ट्रातून कोणतेच प्रकल्प गेले नाहीत. उलट दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि तीन वर्षांनी राज्य सलग दोन वर्षे उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या आसपास पाच हजार कोटी रुपये खर्च करुन औद्योगिक शहर वसवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल मंत्री सामंत यांनी कोकणाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या औद्योगिक शहरात प्राथमिक गुंतवणूक ३८ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातून १ लाख १४ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तेथील प्रकल्प सुरू होईपर्यंत हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगारही उपलब्ध होणार आहे.केंद्र सरकार उद्योग विभागामार्फत राज्याला काही देत नाही, असा फेक नरेटिव्ह विरोधक पसरवतात. मात्र त्याला केंद्र सरकारने चपराक दिली आहे, असे ते म्हणाले. दिघी येथून आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेसह सागरी वाहतूकही जवळ आहे. त्यामुळे कोकणाची आर्थिक उन्नत्ती होईल, असेही त्यांनी सांगितले.पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असेल. त्यामुळे याचा परिणाम देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल. गुंतवणूक वाढेल आणि त्यातून कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत