शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

चांगले क्रिकेटपटू घडण्यासाठी आंतरशालेय स्पर्धा महत्त्वाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

रत्नागिरी : चांगले क्रिकेटपटू तयार करायचे असतील, तर त्यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांसारखे व्यासपीठ खूप गरजेचे आहे. केवळ सराव करून ...

रत्नागिरी : चांगले क्रिकेटपटू तयार करायचे असतील, तर त्यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांसारखे व्यासपीठ खूप गरजेचे आहे. केवळ सराव करून पुढे जाता येत नाही. त्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात, असे उद्गार रणजीपटू अजित सावंत यांनी काढले. येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

माजी कसोटीपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अशोक मंकड यांच्यासमवेत रणजी खेळलेल्या अजित सावंत यांनी लेग स्पिन गोलंदाजी करताना मुंबई संघाला रणजी ट्रॉफी अजिंक्यपद मिळवून देताना गोलंदाजीमध्ये सातत्य दाखविले होते. त्यावेळी भारतात एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज असल्याने कोटा पद्धतीमुळे त्यांची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. अजित सावंत यांनी अकादमीतील खेळाडूंना फिरकी गोलंदाजीच्या शैलीबाबत मार्गदर्शन करताना चेंडूची उंची, टप्प्यातील बदल, लाईन अँड लेंग्थ, फॉलो थ्रो, क्रीजचा वापर कसा करावा व गोलंदाजीमध्ये वैविध्य ठेवताना गुगलीवर फलंदाज कसा बाद करावा, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.

अकादमीचे सल्लागार सचिन थरवळ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कारावेळी अकादमीच्या खेळाडूंशी प्रशंसा करताना उत्तम क्रिकेटपटू तयार होण्यासाठी रत्नागिरीत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांची दालने खुली होणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी अकादमीचे सचिव दीपक देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे जास्त आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बीसीएचे कोच बाबा चव्हाण व प्रशिक्षक राजू सावंत तसेच खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.