शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

चांगले क्रिकेटपटू घडण्यासाठी आंतरशालेय स्पर्धा महत्त्वाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

रत्नागिरी : चांगले क्रिकेटपटू तयार करायचे असतील, तर त्यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांसारखे व्यासपीठ खूप गरजेचे आहे. केवळ सराव करून ...

रत्नागिरी : चांगले क्रिकेटपटू तयार करायचे असतील, तर त्यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांसारखे व्यासपीठ खूप गरजेचे आहे. केवळ सराव करून पुढे जाता येत नाही. त्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात, असे उद्गार रणजीपटू अजित सावंत यांनी काढले. येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

माजी कसोटीपटू सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अशोक मंकड यांच्यासमवेत रणजी खेळलेल्या अजित सावंत यांनी लेग स्पिन गोलंदाजी करताना मुंबई संघाला रणजी ट्रॉफी अजिंक्यपद मिळवून देताना गोलंदाजीमध्ये सातत्य दाखविले होते. त्यावेळी भारतात एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज असल्याने कोटा पद्धतीमुळे त्यांची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. अजित सावंत यांनी अकादमीतील खेळाडूंना फिरकी गोलंदाजीच्या शैलीबाबत मार्गदर्शन करताना चेंडूची उंची, टप्प्यातील बदल, लाईन अँड लेंग्थ, फॉलो थ्रो, क्रीजचा वापर कसा करावा व गोलंदाजीमध्ये वैविध्य ठेवताना गुगलीवर फलंदाज कसा बाद करावा, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.

अकादमीचे सल्लागार सचिन थरवळ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कारावेळी अकादमीच्या खेळाडूंशी प्रशंसा करताना उत्तम क्रिकेटपटू तयार होण्यासाठी रत्नागिरीत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांची दालने खुली होणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी अकादमीचे सचिव दीपक देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे जास्त आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बीसीएचे कोच बाबा चव्हाण व प्रशिक्षक राजू सावंत तसेच खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.