शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सडलेल्या पोषण आहाराची चौकशीही वेळकाढूपणात सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:32 IST

School kolhapur- रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसडलेल्या पोषण आहाराची चौकशीही वेळकाढूपणात सडलीराज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार

रत्नागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.शालेय पोषण आहाराचे धान्य आणि अंगणवाड्यांमधील बालकांना पुरविण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आल्यानंतरही केवळ चौकशी लावून ते प्रकरण बासनात गुंडाळण्यात येत असल्याचे अनुभव जिल्हावासियांना गेल्या तीन चार वर्षात आले आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या धान्याचे ठेकेदार व पुरवठादार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अंगणवाड्यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्याच्या शेडमध्ये अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा पोषण आहाराचा सुमारे २५ टन साठा सडलेल्या अवस्थेत वर्षभरापूर्वी उघडकीस आला होता.

त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार शेखर निकम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.. त्यावेळी एकात्मिक बाल विकास योजनेच्या विभागाने गोदाम सील केले तर अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट मालाचा पंचनामा केला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.गतवर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील शासकीय गोदामामध्ये अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे धान्यामध्ये कचरा तसेच ते धान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी हे गोदामही सील करण्यात आले होते. तसेच अन्न व औषध प्रशासनाला तपासणीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, हे प्रकरणही दाबण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.चौकशी होत नाहीरत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे आणि कुवारबांव प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे सापडले होते. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धान्याच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली होती. राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे समोर आले होते. पण पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी