शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

ग्रामस्थांच्या भूमिकेवर प्रकल्पाचे भवितव्य, उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:48 IST

nanar refinery project Udaysamant Ratnagiri-नाणार सोडून जेथे आवश्यकता आहे तेथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यास शासन तयार आहे, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तेव्हा या प्रकल्पाचे भवितव्य आजही ग्रामस्थांच्या भूमिकेशी निगडित आहे. जेथे ग्रामस्थांचाच विरोध आहे तेथे हा प्रकल्प कदापि होणार नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या भूमिकेवर प्रकल्पाचे भवितव्य, उदय सामंत यांची माहितीहवी असेल तेथे रिफायनरी उभारण्यास शासन तयार

चिपळूण : नाणार सोडून जेथे आवश्यकता आहे तेथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यास शासन तयार आहे, हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तेव्हा या प्रकल्पाचे भवितव्य आजही ग्रामस्थांच्या भूमिकेशी निगडित आहे. जेथे ग्रामस्थांचाच विरोध आहे तेथे हा प्रकल्प कदापि होणार नाही, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.चिपळूण येथे सुमारे ५ कोटी रुपयांतून कौशल्य विकास अभ्यासांतर्गत शासकीय इन्स्टिट्यूट उभारली जाणार आहे. त्याकरिता जागेची पाहणी करण्यासाठी सामंत हे चिपळूण दौऱ्यावर आले असता बोलत होते. ते म्हणाले की, आपल्या मतदार संघात जागा उपलब्ध झाली असती तर रिफायनरी प्रकल्पाचा नक्कीच विचार केला असता. परंतु, आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. एका किनाऱ्यावर जेएसडब्ल्यू तर दुसऱ्या किनाऱ्यावर फिनोलेक्स कंपनी आहे. याशिवाय जेएसडब्ल्यू पोर्ट, चौगुले पोर्ट व आंग्रे पोर्ट आहे.ते म्हणाले की, ठाकरे सरकारने अर्थसंकल्पात कोकणाला खूप काही दिले आहे. रायगड जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उपकेंद्र, संस्कृतचे उपकेंद्र, रस्ते व जलसंधारणासाठी ५३० कोटी रुपये, सिंधुदुर्ग विकास योजनेंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरीसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये पर्यटन, मत्स्य व बंदर विकास आदी प्रकल्प होणार आहेत. तसेच रस्ते व सिंचनसाठी १,३०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.आठवडाभरात निर्णयएमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः अतिशय संवेदनशील आहेत. मात्र, दिल्लीत ज्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, तेच आता संवेदनशीलतेच्या गोष्टी करू लागले आहेत. येत्या आठवड्यात यावर निर्णय होईल. अगदी वयोमर्यादेतही सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.....हे चिपळूणचे दुर्दैव!चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण झाल्यानंतरही इमारत पडून राहात असेल तर ते दुर्दैवी आहे. एखाद्या इमारतीचा वापर होत नसेल, तर अशा इमारतीचे पुन्हा नुकसान होऊ शकते. तेव्हा याविषयी आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीरदृष्ट्या हस्तक्षेप करत बैठक घ्यावी, अशी सूचना केली आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी