शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

रत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या २० उपकेंद्रांना लागणार टाळे, कंपनीकडून सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:23 IST

मोबाईल सेवा सुरू झाल्याने दूरध्वनीचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये जोडण्यांची संख्या कमी आहे. अशा उपकेंद्रांपासून भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याने २० पेक्षा कमी ब्रॉडबँड किंवा दूरध्वनी जोडण्या असलेली जिल्ह्यातील १५ उपकेंद्र बंद करण्यात येणार आहेत. तशा सूचना कंपनीकडून तातडीने देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील बीएसएनएलच्या २० उपकेंद्रांना लागणार टाळेभारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फायद्याऐवजी तोटाच अधिक

शोभना कांबळे रत्नागिरी : मोबाईल सेवा सुरू झाल्याने दूरध्वनीचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये जोडण्यांची संख्या कमी आहे. अशा उपकेंद्रांपासून भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याने २०पेक्षा कमी ब्रॉडबँड किंवा दूरध्वनी जोडण्या असलेली जिल्ह्यातील १५ उपकेंद्र बंद करण्यात येणार आहेत. तशा सूचना कंपनीकडून तातडीने देण्यात आल्या आहेत.भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने आपली दूरध्वनी सेवा अगदी खेडोपाडी पोहोचवली. तांत्रिक अडचणी लक्षात घेता कुठल्याच खासगी कंपनीने दूरध्वनी सेवा सुरू केली नाही. एवढेच नव्हे तर बीएसएनएलने बहुतांश दूरध्वनी सेवेला जोडून ब्रॉडबँड सेवाही दिलेली आहे.खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठीही आॅक्टोबर २००० सालापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेली भ्रमणध्वनी सेवा बीएसएनएलने जिल्ह्यात सर्वत्र सुरू केली.रत्नागिरीत भ्रमणध्वनी सेवा २००९ सालापासून सुरू झाली. या सेवेने सर्व वयोगटातील व्यक्तिंना आकर्षित केली. अल्पावधीतच ही सेवा अत्यावश्यक ठरली. आता तर व्यक्तीगणिक नव्हे; तर एक व्यक्ती एकापेक्षा जास्त मोबाईल वापरू लागली आहे. त्यामुळे आता मोबाईलची संख्या वाढल्याने दूरध्वनींचा वापर कमी झाला आहे.

विविध आस्थापना तसेच शासकीय कार्यालयेवगळता घरातील दूरध्वनी कालबाह्य होऊ लागले आहेत. त्यामुळे काहींनी दूरध्वनी सेवा बंद केली तर अनेकांचे दूरध्वनी केवळ शोभेपुरतेच राहिले. काहींनी ब्रॉड बँडसेवेपुरताच उपयोग मर्यादित ठेवला.मोबाईलचा वापर वाढल्याने संपूर्ण देशासह रत्नागिरी जिल्ह्यातील दूरध्वनी सेवा कोलमडली. त्यामुळे एका उपकेंद्रांच्या अखत्यारित असलेल्या किरकोळ दूरध्वनी जोडण्यांच्या माध्यमातून कंपनीला महिना केवळ २ ते ५ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळते, मात्र, त्या उपकेंद्राच्या वीजबिल, दुरूस्ती तसेच मनुष्यबळासाठी १५ ते २० हजार रूपये खर्च करावे लागतात. त्यामुळे कंपनीला वर्षाकाठी सुमारे चार कोटीचा तोटा सोसावा लागत आहे.संपूर्ण देशभरच ही स्थिती असल्याने कंपनीने ज्या उपकेंद्राच्या अखत्यारित २०पेक्षा कमी दूरध्वनी तसेच ब्रॉडबँड जोडण्या आहेत. ती उपकेंद्र बंद करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. महाराष्ट्रात त्याचा अंमलही सुरू झाला. मात्र, रत्नागिरीत वर्षभर ही सेवा सुरूच होती. परंतु या कंपनीला दरवर्षीच एवढा मोठा तोटा सोसावा लागत आहे.सध्या जिल्ह्यात १६८ उपकेंद्रांत एकूण ३० हजार दूरध्वनीधारक आहेत. त्यापैकी २०पेक्षा कमी जोडण्या असलेली १५ उपकेंद्र बंद होणार आहेत. या केंद्रांना कंपनीकडून तशा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.बीएसएनएल ग्राहकबीएसएनएलचे २०१५ साली जिल्ह्यत २,१०,००० मोबाईलधारक, ४५,००० दूरध्वनीधारक, तर १० हजार ब्रॉडबँडधारक होते. मात्र, मोबाईलची संख्या वाढून ती आता ३ लाखांपर्यंत गेली असून, दूरध्वनीधारकांची संख्या ३० हजारावर आली आहे. ११ हजार ब्रॉडबँडधारक आहेत.जिथे बीएसएनएलचे टॉवर आहेत, त्यांचे बिल व्यापारी दराने आकारले जाते. मात्र, उपकेंद्रांना घरगुती पद्धतीने आकारणी केली जाते. जिथे टॉवर आणि उपकेंद्र एकाच ठिकाणी आहेत तरीही महावितरणकडून उपकेंद्रांना मात्र सापत्नभाव जात असल्याने उपकेंद्रांचे बिल भरमसाठ होते.बंद होणारी उपकेंद्र (तालुकानिहाय)

  1. दापोली : कादवली
  2. राजापूर : मूर, भालावली,
  3. केळवली, सोलगाव
  4. संगमेश्वर : करजुवे,
  5. कनकाडी, पोचरी
  6. लांजा : विलवडे, हर्चे, कणगवली
  7. चिपळूण : दहीवली, बोरगाव, नांदगाव
  8. रत्नागिरी : डोर्ले
टॅग्स :BSNLबीएसएनएलRatnagiriरत्नागिरी