शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूपासून सुटका करून घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ, जिल्हा शासकीय रूग्णालय सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:55 IST

वर्षभरात तंबाखूचे व्यसन लागलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ७९२ लोकांचे जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ जणांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायमचे सोडून या व्यसनातून आपली सुटका करून घेतली आहे.

ठळक मुद्देतंबाखूपासून सुटका करून घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ, जिल्हा शासकीय रूग्णालय सतर्क जिल्ह्यातील ६ हजार ७९२ जणांचे समुपदेशन, वर्षभरात ४०३ जणांनी सोडले तंबाखूचे व्यसन

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : कोणतेही व्यसन वाईटच. कारण एकदा का ते जडलं की, ते सुटायला प्रचंड प्रयत्न करावे लागतात, मात्र, मरणाला कवटाळण्यापेक्षा असे प्रयत्न करणे केव्हाही चांगलेच. गेल्या वर्षभरात तंबाखूचे व्यसन लागलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ७९२ लोकांचे जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ जणांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायमचे सोडून या व्यसनातून आपली सुटका करून घेतली आहे. गेल्या चार वर्षात या व्यसनापासून सुटका करून घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर तंबाखूचे व्यसन लागलेल्या नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. सन २०१८ - १९ या कालावधीत ११ प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. यामध्ये ५३८ लोकांना प्रशिक्षत करण्यात आले. या कार्यशाळेतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन २ हजार ४१ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. यामध्ये ५१२ लोकांना जागृत करण्यात आले आहे.गतवर्षी जिल्हा रूग्णालयातर्फे ६ हजार ७९२ इतक्या लोकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातील ४०३ लोकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडल्याची नोंद करण्यात आली आहे. तंबाखूचे व्यसन सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून, २०१७ - १८ मध्ये केवळ ६५ लोकांनी तंबाखूचे सेवन सोडले आहे. तर तंबाखू सेवनामुळे कर्करोगग्रस्त रूग्णांची संख्या १२पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अजूनही तंबाखूचे सेवन करणे सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, यातील काहींची नोंदच होत नसल्याचे दिसत आहे.दोन वर्षात ४९ हजार १२० दंड वसूलसार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास मज्जाव केलेला आहे. अशी व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. गेल्या दोन वर्षात जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या लोकांकडून ४९ हजार १२० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सन २०१७-१८ मध्ये १५ हजार ४५० तर सन २०१८ - १९ मध्ये ३३ हजार ६७० इतकी दंडाची रक्कम वसूल केली आहे.धाड पथकाची नजरसिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा कायदा २००३) अन्वये जिल्ह्यात धाड पथकाकडूनही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात या पथकाने २५९ जणांवर कारवाई करून ४४ हजार ६७० इतका दंड वसूल केला आहे.तंबाखूमुक्त शाळातंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तंबाखूमुक्त शाळा अशी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ७ अटी ठेवण्यात आल्या आहेत. या ७ अटींचे पालन करणाºया शाळेला तंबाखूमुक्त शाळा म्हणून जाहीर करण्यात येते. 

तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला केवळ कर्करोगच होतो असे नाही. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कोणताही आजार उद्भवू शकतो. त्यामुळे या व्यसनापासून लांब राहणेच चांगले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीने आपली मौखिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय रूग्णालयात स्वतंत्र कक्ष आहे.- डॉ. शैलेश दशरथ गावंडे,जिल्हा सल्लागार, एनटीसीपी, जिल्हा शासकीय रूग्णालय, रत्नागिरी.

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी