शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:27 IST

Temperature, Farmer, Ratnagiri, Agriculture Sector विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

ठळक मुद्देअचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमानशेतकऱ्यांचे नुकसान

रत्नागिरी : विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.आंबा पिकासाठी दिनांक १ डिसेंबर २०२० ते १५ मे २०२१ अखेर अवेळी पाऊस, दिनांक १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ अखेर कमी तापमान, १ मार्च २०२१ ते १५ मे २०२१ अखेर जास्त तापमान तसेच १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मे २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे.

काजू पिकासाठी १ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत अवेळी पाऊस, १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर कमी तापमान, १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपये तर काजूसाठी पाच हजार रूपये भरावयाचे आहेत. आंबा पिकाला हेक्टरी एक लाख ४० हजार तर काजूसाठी ३३ हजार ३३३ रूपये विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यावर्षी पावसाळा लांबल्याने अन्य ऋतू लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून फळपीक विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविताना इथल्या वातावरणाचा अभ्यास करून निकष ठरविणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. योजनेच्या निकषात बदल करायला हवेत.- राजन कदम,बागायतदार, रत्नागिरी.

टॅग्स :TemperatureतापमानFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्र