शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:27 IST

Temperature, Farmer, Ratnagiri, Agriculture Sector विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

ठळक मुद्देअचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमानशेतकऱ्यांचे नुकसान

रत्नागिरी : विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.आंबा पिकासाठी दिनांक १ डिसेंबर २०२० ते १५ मे २०२१ अखेर अवेळी पाऊस, दिनांक १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ अखेर कमी तापमान, १ मार्च २०२१ ते १५ मे २०२१ अखेर जास्त तापमान तसेच १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मे २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे.

काजू पिकासाठी १ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत अवेळी पाऊस, १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर कमी तापमान, १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपये तर काजूसाठी पाच हजार रूपये भरावयाचे आहेत. आंबा पिकाला हेक्टरी एक लाख ४० हजार तर काजूसाठी ३३ हजार ३३३ रूपये विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यावर्षी पावसाळा लांबल्याने अन्य ऋतू लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून फळपीक विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविताना इथल्या वातावरणाचा अभ्यास करून निकष ठरविणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. योजनेच्या निकषात बदल करायला हवेत.- राजन कदम,बागायतदार, रत्नागिरी.

टॅग्स :TemperatureतापमानFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्र