शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 22:13 IST

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या.

राजापूर : रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या अंगावर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात गाडीचा चालक निखिल पोपट साळुंखे (वय ३२, रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती उज्ज्वला भारत सरगर (२५) यांनी पाेलिसांना दिली.

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या. याचदरम्यान महामार्गावर कंटेनर (एचआर ५५, वाय ६१०८) हा गोव्याकडून मुंबईकडे चालला होता. हा कंटेनर कादीर कशौत अली (३६, रा. तिलजा, ता. समरीयाना, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) हा चालवीत होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि उन्हाळे येथील अवघड वळणावर कंटेनरला अपघात झाला. त्यावेळी कंटेनरचा फाळका तुटला व भाजी विक्रीसाठी बसलेल्या निखिल साळुंखे यांच्या अंगावर जाऊन पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने त्यांना पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी निखिल साळुंखे हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक कादीर शौकत अली याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

अनेक वर्षे भाजी विक्री

नकुशा या गेली अनेक वर्षे सांगली येथून स्वतः बोलेरो पिकअप्‌मध्ये भाजी भरून घेऊन कोकणात येऊन त्याची विक्री करतात. त्या स्वतः गाडी चालवितात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत कधीही अपघात केलेला नाही. मात्र, या विचित्र अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूरकडे हलविण्तया आले आहे. कंटेनर चालक कादीर शौकत अली याला रत्नागिरीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

दाेन दिवसांपूर्वी राजापुरातसांगलीतील हे कुटुंब भाजी विक्रीसाठी काेकणात येते. राजापूर येथे दाेनच दिवसांपूर्वी ते भाजी विक्रीसाठी आले हाेते. गंगा तिठा येथे भाजीचा स्टाॅल ते मांडतात. मात्र, रस्त्यावरून जाणारा कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनून आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी